20 people for funeral and 50 for marriage allowed due to corona in nagpur 
नागपूर

नागरिकांनो! अंत्यसंस्कारासाठी २०, तर लग्नात फक्त ५० जणांना परवानगी

नीलेश डोये

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांनाच परवानगी असणार आहे. लग्न समारंभात फक्त ५० जणांना परवानगी असणार आहे. नियमांचे पालन न केल्यास हॉल, लॉन मालकास जबाबदार ठरवून लायसन्स रद्द करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिले. 

अंत्यसंस्कारासाठी उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत नियमांचे पालन होत नसल्यास आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मास्कचा वापर न करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करावी होईल. विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा व इतर सर्वच प्रकारच्या व्यक्तींच्या एकत्रित येण्यावर प्रतिबंध करण्यात आले आहे. 
गृहविलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. खासगी डॉक्टरांकडे आजारी रुग्ण आढळल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नियंत्रण कक्ष येथे माहिती देणे आवश्यक आहे. माहिती न देणारे रुणालये कारवाईस पात्र ठरतील. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही, त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कंटोन्मेंट झोनमधून अवागमन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देऊन चाचणी किमान तिप्पट करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT