Accident insurance benefits to half of farmers in four years 
नागपूर

चार वर्षांत निम्म्याच शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ; प्रलंबित प्रकरणांची यादी मोठी

नीलेश डोये

नागपूर : शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे दोन लाखांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येते. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अर्जाच्या पन्नास टक्केच शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. अर्ज नाकारण्यासोबत प्रलंबित अर्जांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघातामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास अर्थसाहाय्य देण्यासाठी चार वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली.

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येते.

विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ या वयोगटातील सात-बाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदारास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा लागतो. गेल्या चार वर्षांत ५१ टक्केच शेतकऱ्यांच विम्याचा लाभ देण्यात आला.

एकूण प्रस्ताव - ३५९
मंजूर दावे - १८५
नामंजूर दावे - ८२

प्रलंबित दावे - ९२

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT