संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
नागपूर

कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला "फुकट' सल्ला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येत्या एक जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार अशी बातमी धडकली आणि विदर्भात शेतकऱ्यांची लगभग सुरू झाली. कृषी विभागाही कामाला लागला. त्यात त्यांनी बियाण्यांच्या परीक्षण कसे करावे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करतात, ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना घरीच बियाण्यांचे परीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. परीक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली आहे. थेट बांधावर खते व बियाणे पुरवठा मोहिमेंतर्गत 204 शेतकरी गटांतर्फे 1500 शेतकऱ्यांना 632 मेट्रिक टन खते 9323 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आलेला आहे. परीक्षण करताना बियाण्यांची चाळणी करून त्यामधील काडी, कचरा, खड्डे, लहान फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणी नंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमान पत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारीतीने 100 बियांच्या 10 गुंडाळ्या तयार कराव्या. नंतर या गुंडाळी पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. नंतर हळूहळू उघडून पाहावे. त्यामध्ये बीजांकुर झालेल्या बिया मोजव्यात.

दुसरी पद्धत अशी आहे की, मातीच्या पसरट कुंड्यांमध्ये बारीक वाळूचा वापर करूनसुद्धा बीज परीक्षण करता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःकडील चाळणी नंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी वापरावे. साधारणतः चार कुंड्यांमध्ये प्रत्येकी 25 बियाणे चाचणीसाठी वापरावे. कुंड्यातील वाळू ओली करावी. 4 दिवसानंतर अंकुरण झालेल्या बियाण्यांची मोजणी करावी. जर अंकुर उगविण्याची संख्या 50 असेल तर आपल्या बियाण्यांची उगवण क्षमता 50 टक्के आहे असे समजावे. जर अंकुर उगविण्याची क्षमता 80 असेल तर 80 टक्के उगवण क्षमता आहे असे समजावे. अशा पद्धतीने उगवण क्षमतेचा अंदाज घरच्या घरी शेतकऱ्यांना घेता येतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT