anil deshmukh criticized bjp on ed inquiry
anil deshmukh criticized bjp on ed inquiry 
नागपूर

'भाजप विरोधात बोलले तर ईडी अन् सीबीआय चौकशी लागतेय'

संजय डाफ

नागपूर : ईडीचा अशाप्रकारे उपयोग करणे दुर्दैवी आहे. राज्यात अशाप्रकारचं राजकारण कधीही पाहण्यात आले नाही. भाजपच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, आता सीबीआयबाबत आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या परवानगीशिवाय सीबीआय राज्यात चौकशी करू शकत नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

राज्यात वारंवार अनेक जणांना ईडीची नोटीस येत असल्याचे समोर आले आहे. नुकतेच रविवारी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ही चौकशी असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही प्रताप सरनाई यांच्या मुलाची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यावरून भाजप अन् महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आजच नागपुरात अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

ईडीच्या नोटीसमध्ये काहीही नवीन नाही - प्रफुल्ल पटेल
ईडीच्या नोटीसमध्ये काहीही नवीन नाही. भारतात अनेक लोकांना ईडीची नोटीस येतेय, हे आता इतकं स्वस्त झालंय, की याचं कुणालाही खराब वाटत नाही. आजकाल कुणालाही नोटीस बजावली जातेय. त्यांचा संबंध असोत किंवा नाही. ईडी नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर ते बाहेर येईल, यात राजकारण आहे का ते ही कळेल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT