Bad Effect on Cold Water Business in Lockdown 
नागपूर

सण, समारंभ झाले "लॉक', या व्यवसायावर आली अवकळा 

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : शहरातील विविध समारंभाची शान बनलेल्या कूल जारमधील थंड पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे केवळ उन्हाळ्यात चालणारा हा व्यवसाय बाराही महिने तेजीत होता. यामुळे अनेक नवउद्योजकांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. कोरोनामुळे मात्र कूल जारमधील थंड पाण्याच्या व्यवसायावरही पाणी फेरले. यातील पाच ते सहा हजार कामगार बेरोजगार झाले असून, 30 टक्के व्यावसायिकांवर या व्यवसायाला "लॉक' लावण्याची वेळ आल्याची माहिती आहे. 

लग्नात हौसेच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकजण शुद्ध पाण्याचा आग्रह धरला जात होता. त्यामुळेच खासगी, सरकारी कार्यालये, दुकाने, मॉल्स, विद्यार्थी, ट्युशन्स क्‍लासेससह सर्वत्र दररोज लाखो लिटर कूल जारमधील थंड पाण्याची मागणी होत होती. उन्हाळ्यात तर पाणी व्यवसायिकांना श्वास घ्यायला वेळ नसतो, एवढी डिमांड असते. परिणामी, मागणी 40 टक्‍क्‍यांनी वाढते. यंदा मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भरउन्हाळ्यातच टाळेबंदी झाली. खासगी, शासकीय, हॉटेल्स, लग्नसोहळे, बैठका, सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी आदी कार्यक्रम टाळेबंदीमुळे रद्द झालेत आणि या व्यवसायाला ग्रहण लागले. परिणामी, लाखोंची गुंतवणूक सुरू केलेल्या या व्यावसायिकांना आता हे थंड पाणी विकायचे कोणाला, असा प्रश्‍न पडला आहे. 

शहरात अंदाजे 1,800 पेक्षा अधिक नॉन ब्रॅण्डेड कूल जारमधील थंड पाण्याची विक्री करणारे व्यावसायिक आहेत. त्यात अंदाजे पाच ते सहा हजार कामगार कार्यरत आहेत. या व्यवसायात महिन्याला सरासरी अडीच कोटींच्या जवळपास उलाढाल होत असे. सलग साडेतीन महिने हा व्यवसाय बंद असल्याने अंदाजे 10 कोटींपेक्षा अधिकचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे.

तुकाराम मुंढे देणार का बारा वर्षांचा हिशेब! काय आहे प्रकरण वाचा
                                                                                              

अनलॉकनंतर आता दुकाने, खासगी आणि शासकीय कार्यालये उघडण्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे थंड पाण्याची मागणी होत असली तरी त्याची टक्केवारी फक्त 20 टक्केच आहे. पूर्वी सर्वसाधारण व्यक्तीही बाटलीबंद पाणी सर्वत्र पिताना दिसत होता. आता कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकही घरूनच पाणी सोबत घेऊन बाहेर पडतो आहे. 

उन्हाळा कूल जारमधील थंड पाण्यासाठी सुगीचा काळ असतो. यंदा टाळेबंदीमुळे या व्यवसायात शून्य टक्के ग्रोथ होती. संपूर्ण लग्नसमारंभ, सोहळ्याचा सिझनही गेला. शासनाकडून आकारण्यात येणारे शुल्कही या व्यवसायातून निघणे कठीण झाल्याने अनेकांनी या व्यवसायाला रामराम ठोकला आहे. हा उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 
अभिताभ मेश्राम, अध्यक्ष, प्रोवेस ग्रुप 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: मुंबईचा रोमांचक विजय, पण महाराष्ट्र-विदर्भ पराभूत; सूर्यकुमार, जैस्वाल अपयशी, तर श्रेयस, रिंकू सिंग चमकले

Congress Leader Attack: अकोल्यात काँग्रेस नेत्यावर हल्ला; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा

ECI notice to Mohammed Shami: मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस!, जाणून घ्या, नेमकं काय कारण?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

SCROLL FOR NEXT