Nagpur News : पावसामुळे बाजरीचे भाव वाढले
Nagpur News : पावसामुळे बाजरीचे भाव वाढले  sakal media
नागपूर

Nagpur News : पावसामुळे बाजरीचे भाव वाढले

राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवाळीनंतर किराणा बाजारातील मालाच्या घाऊक बाजारातील बहुतेक मालाची मागणी कमी झाली आहे. महिन्याच्या अखेर असल्याने बाजारातील चैतन्यही गायब झाले आहे. मात्र, अवेळी आलेल्या पावसामुळे आवक कमी असल्याने बाजरीच्या भावातील तेजी आहे. या आठवड्यात बाजरीच्या दरात प्रति क्विंटल चारशे रुपयांनी वाढ झालेली. हिवाळ्यात बाजरीचे भाव वाढत असल्यानेही मागणी वाढलेली आहे.

दिवाळीनंतर किराणा बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असते. त्यामुळे मागणीही नसते. यंदाही तसेच चित्र पाहण्यास मिळत आहे. दिवाळीत धान्यांच्या तुलनेत डाळी, बेसन, पोहा, रवा , तूप, खाद्यतेल, गूळ यांची मागणी असते. सध्या बहुतेक मालाची मागणी कमी झाली, साखर, गूळ यांच्या भावात किंचित घट झाली आहे. गुळाच्या भावात प्रति क्विंटल शंभर रुपयांनी घट झाली. मागणी अभावी सर्व प्रकारच्या डाळींच्या बाजारातही मंदी कायम राहिली आहे. या आठवड्यात डाळींच्या भावात प्रति क्विंटल पन्नास ते शंभर रुपये इतकी घट झाली आहे. तुर्तास खाद्यतेलांची मागणी थोडी वाढल्याने त्यांच्या दरातील घसरण थांबली आहे.

धान्यांमध्ये ज्वारी आणि गव्हाची आवक जावक साधारण असून दर स्थिर आहेत. साठा संपत आल्यामुळे बाजारात बाजरीची आवक कमी प्रमाणात होत आहे. नवा हंगाम लवकरच सुरु होणार असला तरी अलीकडेच झालेल्या पावसामुळे ल बाजरीच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे भविष्यात चांगल्या प्रतीच्या बाजरीचा आणखी तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे. यामुळे गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या बाजरी दरात क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांनी वाढ झाली.

बाजरीचा प्रति क्विंटलचा दर २२०० ते २५०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. एक महिन्यापूर्वी हेच भाव १८०० २१०० रुपये होते. नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असला तरी आवक कमी आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे तांदळाच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे भावात वाढ झालेली आहे. यंदा धानाचे भाव जास्त निघाले असून, पुढील काळात तांदळाच्या भावात दहा ते पंधरा टक्‍के इतकी वाढ होण्याची शक्‍यता आहे असेही नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

दक्षिण भारतात पावसाने धुमाकूळ घातला असून, त्याचा परिणाम हा नारळाच्या आवकवर झाला आहे. गेल्या आठवड्यापासून नारळाची आवक कमी होत आहे. त्याचवेळी स्थानिक बाजारात मागणी मर्यादित असल्याने आवक कमी होऊनही नारळाचे भाव स्थिर राहिले आहे. पुढील आठवड्यात नारळाची आवक पुर्ववत होईल असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT