कळमेश्‍वरः राखी खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे सुनसान पडलेला बाजार.  
नागपूर

ग्राहक बाजाराकडे फिरकता फिरकेना, टपाल विभाग म्हणतो, ‘वुई आर रेडी’,...

चंद्रकांत श्रीखंडे /सुधीर बुटे

कळमेश्वर(जि.नागपूर) : ‘बहनाने भाई की कलाईसे प्यार बांधा है...’ असे भाव व्यक्त करणाऱ्या बहिणींच्या मनात मात्र यंदा नैराश्‍येचे ढग दाटून येत आहेत. कारण मागील चार महिन्यांपासून कोरोना विषाणू महामारीचे संकट सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. कोरोनाचे राष्ट्रीय संकट केव्हा संपेल, याची प्रतीक्षा सर्वजण करीत आहेत. ग्राहक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तर विक्रेते घाबरत घाबरत विक्री व्यवसाय करीत आहेत. राखीविक्रेते माञ यंदा राखी खरेदीसाठी ग्राहकांची विणवणी करताना दिसत आहेत. परंतू या नैराश्‍येवर मात करण्यासाठी टपाल विभाग बहिणभावाचे नाते अधिक घट्ट करण्यास सरसावला आहे.

सणावर कोरोनाचे सावट, ग्राहकांच्या मनात भीती
बाजारात नेहमीप्रमाणे दहा रुपयांपासून १०० ते १५० रुपयांपर्यत राख्या विक्रीसाठी आलेल्या आहेत. यात प्रत्येकी पाच ते २५ रुपयांपर्यंतची वाढही झाली आहे. माञ खरेदीसाठी ग्राहकच नसल्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे,अशी प्रतिक्रिया दुकानदार व्यक्त करीत आहेत.
 

टपाल विभागाची खास राखी भेट
काटोल : आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात राखी ऑनलाईन पाठविण्याची सोय असली तरी खास बहिणीकडून भावाला पाठविलेल्या राखीत भावना व प्रेम प्रत्यक्षात 'राखी’च्या निमित्ताने पोहचविले जात असल्याने असे अतूट नाते सातासमुद्रापलीकडून साधण्याचे काम पोस्ट विभाग बदलत्या काळात जलद गतीने तत्पर करीत असल्याचा प्रत्यय त्यांच्या सेवेतून दिसून आला. स्वातंञ्यापूर्वी व आजही सेवा अखंड बदलत्या स्वरूपात सुरू असल्याने जनताही त्याचे स्वागत करीत आहे. राखी सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा, नात्याला घट्ट करणारा सण पिढ्यानपिढ्यांपासून प्रचलित आहे. त्यात भावनिक आसक्ती आहे. दरवर्षी राखीचे टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखीकरिता टपाल विभाग नागपूर, भंडारा आणि गोंदिया ग्रामीणच्या माध्यमातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘स्पीड पोस्ट राखी’सेवा
राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था नागपूर विभागाचे प्रवर अधीक्षक टी.ए.व्ही.सरमा यांच्या मार्गदर्शनात नागपूर, भंडारा आणि गोंदिया व ग्रामीण अंतर्गत सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या प्रभावात रक्षाबंधन अडचणीत येणार असे वाटत होते. परंतू ती निराशा डाक विभागाने दूर केली आहे. शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे सणासाठी भेट घेता येणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेन्ट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे आणि ‘स्पीड पोस्ट राखी’च्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल’ अशी घोषणा देऊन आनंद मिळवण्याची इच्छा आहे. राखीचा सण सोमवारी (ता.३) असल्यामुळे, नागपूर ग्रामीण टपाल विभागाने२ ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था देखील सुरू होती.


 

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT