Discussion only on Panchayat, construction in Zilla Parishad Standing Committee meeting 
नागपूर

ऐकावे ते नवल... ग्रामीण जनता, शेतकरी, शिक्षण जिल्हा परिषदेतून बेदखल

नीलेश डोये

नागपूर  : जिल्हा परिषद ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रबिंदू मानले जाते. ग्रामीण भागातील जनता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागण्याची अपेक्षा असते. पुरामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन व कापूस पिकाचीही हानी झाली. जिल्ह्यातील शेतकरी या नुकसानीमुळे चिंतित आहेत.  या विषयांकडे दुर्लक्ष करून सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केवळ बांधकम आणि पंचायत विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे जनतेसोबत शेतकरीही जिल्हा परिषदेत बेदखल असल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलांचे नुकसान झाले आहे. दळणवळणाचे रस्ते खराब झाले आहेत. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांवर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. नदीकाठच्या गावात घरांचेही नुकसान झाले आहे. असे असताना अजूनही पंचनामे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले नाही. एकीकडे कोरोनामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला आहे. 

अशात लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांच्या बाबतीत आग्रही भूमिका घेऊन बैठकांमधून त्यावर कशी मात करता येईल. जनतेला दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना करता येईल. यावर चर्चा होणे, त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविणे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असताना, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत निव्वळ स्वत:च्या हिताच्या विषयावर चर्चा करण्यात येते. 

दोन तास चाललेल्या या बैठकीत फक्त एकच मिनिट शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. झालेल्या नुकसानीचीही साधी माहितीही घेण्यात आली नाही. शाळा सुरू होणार आहे. ऑनलाईन शिक्षणाचा साधा आढाही घेण्यात आला नाही. अध्यक्षांनी बैठकीत दुरूस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याचे निर्देश दिले आहे. यावरून ग्रामीण भागाबद्दल लोकप्रतिनिधी किती गंभीर आहे, हे दिसून येते.

 
योग्य निर्णय घेण्यात येतील
बैठक आॅनलाईन घेण्यात आली. तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा करता आली नाही. शासनाकडून मदत देण्यात येत असून त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्यात येतील.
रश्मी बर्वे, अध्यक्ष

 
आरोग्याबाबत सत्ताधारी गंभीर नाही
आरोग्याबाबत सत्ताधारी गंभीर नाहीत. शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू दिला नाही. मी मुद्दा मांडला की अवंतिका लेकुरवाडेंना समोर करून विषय भरकविण्यात येते. यांना घोटाळ करण्यापासून वेळ नाही. अनिल निधान, विरोधी पक्ष नेते.
 

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT