Nagpur : महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? sakal
नागपूर

महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्टतेचा अभाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्यमान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यानंतर निवडणूक अपेक्षित असून राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश दिले आहेत. परंतु हा आराखडा किती दिवसांत तयार करायचा? याबाबत स्पष्टता नाही. याशिवाय प्रभागासाठी महिला व इतर आरक्षणासंदर्भात अद्यापही कुठलेही आदेश नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणूक फेब्रुवारी-मार्चऐवजी पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा अधिकारी वर्गात रंगली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार की एक सदस्य, यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगाने मागील महिन्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही निवडणूक पुढे ढकलली जाणार की निश्चित वेळेत होणार? यावरही विविध पातळ्यांवर चांगलीच चर्चा रंगली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक निश्चित वेळेत होईल, असा एक मतप्रवाह आहे. परंतु महापालिका अधिकारी वर्गात वेगळीच चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात दिले. त्यानुसार महापालिकेने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असून ते प्रगतिपथावर आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी कालावधी निश्चित केला नाही.

साधारणपणे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात कालावधी निश्चित केला जातो. परंतु मागील महिन्यात काढलेल्या आदेशात कच्चा आराखडा कधीपर्यंत तयार करावा, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. याशिवाय ओबीसी आरक्षण वगळून महिला आरक्षणाबाबतही अद्याप निवडणूक आयोगाने आदेश काढले नाही. याशिवाय राज्य सरकारने दोन सदस्यीय प्रभाग रचनेस मंजुरी दिल्यास पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

जेवढी लोकसंख्या तेवढेच मतदार

सध्या एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्यात येत असल्याने एका प्रभागाची लोकसंख्या १६ हजारापर्यंत येत असल्याचे सूत्राने नमुद केले. परंतु गेल्या दहा वर्षात शहर सीमेवरील वस्त्यांमध्ये घरांची संख्या व पर्यायाने लोकसंख्याही वाढली. स्वाभाविकपणे मतदारांची संख्याही वाढली असेल. त्यामुळे प्रभागाची लोकसंख्या व मतदारांची संख्याही १६ हजार किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT