farmers are unhappy about governments wait and watch policy 
नागपूर

पैसेवारी काढताच कशाला?

नीलेश डोये

नागपूर : मागील वर्षाच्या खरीप हंगामात केंद्राच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून जमीन महसुलात सूट आणि वीजबिलात सवलत दिली आहे. पैसेवारीच्या आधारे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पैसेवारी काढताच कशाला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

2019 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळाले. शासनाकडून काढण्यात आलेल्या पैसेवारीच्या सर्वेक्षणातून याला दुजोरा मिळाला. एकट्या नागपूर विभागातील हजारांवर गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी दर्शविण्यात आली. टंचाईग्रस्त गाव जाहीर करताना पैसेवारीचा आधार घेण्यात येतो. तसेच काही सवलतीही देण्यात येते. ठाकरे सरकारने केंद्र सरकारच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले असून महसूल वसुलीत सूट, वीजबिलात 33 टक्के सूट, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने दिली नाही. 

सरकारला कायदे माहीत नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना मदतीचा आदेश काढण्यासाठी सहा महिन्यांचा काळ घेतला. पैसेवारीच्या आधारे दुष्काळी ठरलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची गरज आहे. पैसेवारीचा आधार घेण्यात येत नसेल तर पद्धतच बंद करून टाकावी. 
-परिणय फुके, आमदार. 

सरकारने कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये सवलती द्याव्या. जुन्याचे पुनर्गठन झाल्यास नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. हा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत मांडून सरकारकडे पाठपुरावा करू. 
-वंदना बालपांडे,सदस्य जि. प. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT