पारशिवनीः निकृष्ट बांधकामामुळे महापूरात वाहून गेलेला साहुली माहुली पूल.  
नागपूर

‘सालई, माहुली’ला जलसमाधी, नयाकुंड मात्र जुना असूनही साबूत, काय भानगड आहे, वाचा...

रूपेश खंडारे

पारशिवनी (जि.नागपूर) :  सालई, माहुली काही गावांची नावे नाहीत किंवा कुठल्या प्रकल्पाचेही नाही. अहो, ‘पेंच’ नदीवरील हे पूल आहेत राव! तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारा अती महत्वाच्या दुवा म्हणजे हे पूल होते बरं का ! पण अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन वर्षीतच पुलाचे ‘बारा वाजले’. कालपरवा आलेल्या पुराच्या पाण्यात या पूलाला जलसमाधी मिळाली. त्यामुळे या पुलाच्या बांधकामात कितीतरी भ्रष्ट लोकांनी स्वतःचे हात ओले करून घेतले असल्याने हा पूल नदीच्या पुरात वाहून गेला आणि येथील ३० गावांचा संपर्क मात्र तुटला.

अधिक वाचाः कोळसा ट्रक उलटून चालकाचा मृत्यू, आता वेकोलि प्रशासनावर होताहेत हे आरोप…
 

१२.२० कोटी रुपये आला खर्च
१जानेवारी२०१४ ला या पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या  हस्ते झाले. तेव्हाही आजी-माजी आमदारांत स्वागतावरून चांगलीच जुंपली होती. तो क्षण आजही तालुकावासींच्या आठवणीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प  निधी अंतर्गत१२.२० कोटी रुपये या बांधकामावर खर्च करण्यात आले. बांधकाम करतेवेळी बांधकाम निकृष्ठ होत असल्याने स्थानिकांनी वेळोवेळी बांधकाम विभागाकडे तक्रारी सादर केल्या. पण इतरांना येथे ‘हात ओले’ करायचे होते. म्हणूण या बांधकामाच्या तक्रारीकडे कुणीही लक्ष दिले नाही. दोन वर्षे विलंबाने पुलाचे बांधकाम येथील कंत्राटदार अजयपाल मंगल ( ठाणे मुबंई) यांनी केले. त्यांनी हा पूल ३० जुन२०१८ पूर्ण केला. तत्कालीन भाजप आमदार मल्लीकार्जून रेड्डी यांनी या पुलाचे लोकार्पण करुन रहदारीकरीता पूल खुला करुन दिला. पण हा पूल केवळ दोन वर्षही पाण्याच्या मारा सहन करु शकला नाही, नी पुराच्या पाण्यात रविवारी पुलाला जलसमाधी मिळाली. बांधकाम कंत्राटदार, अधिकारी
नागरिकांनी पुलाच्या बांधकामाच्या तक्रारी केल्या होत्या. वेळीच कुणीही लक्ष दिले नसल्याने आज हा पूल पाण्यात कोसळला, असा थेट आरोप येथील नागरिकांनी प्रसारमाध्यामांसमोर केला.

अधिक वाचाः महिला, बालकल्याण विभागात बदल्यांचा घोळ, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

चौकशी केल्यावर समोर येईल स्थिती
जुन्या काळातील नयाकुंड पूल आजही पाण्याचा मारा सहन करीत उभा आहे. नदीला कितीतरी पूर आले, तरी तो डगमगला नाही. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, लांबलचक अंतर असूनदेखील या पुराच्या पाण्यात वाहून गेला नाही. सालई, माहुली पेंच नदीवरील पूल अल्पावधित जलसमाधी घेतो म्हणजे काय? पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करुन हा पूल उभा केला गेला असावा, हे चौकशी केल्यावर समोर येऊ शकते. त्यासाठी या पुलाच्या बांधकामाची निःपक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

संजू राठोडच्या 'गुलाबी साडी' गाण्यासाठी अभिनेत्रीला किती पैसे मिळाले? प्राजक्ता म्हणाली, 'चांगला मित्र म्हणून त्याने...'

SCROLL FOR NEXT