file 
नागपूर

मायबाप सरकार थोडासा उजेड आमच्याबी जिंदगीत पडू द्या !

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि.नागपूर) :आम्हीचाबी कायापालट व्हावा, आम्हीबी प्रगतीशील शेतकरी व्हावे; असे आम्हालाही वाटते. जिंदगीभर आम्ही फक्त फाटकी जिंदगी पांघरायची काय? सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास घडवू पाहाते. परंतू त्याचा फायदा आम्हाला कधी होतच नाही. मायबाप सरकार थोडाता प्रकाश आमच्या जिंदगीत पडू द्या!, असा केविलवाणा टाहो फोडत शेतकऱ्यांनी वीज जोडणीची मागणी केली आहे, ही मागणी पहिल्यांदाच नव्हे अनेकदा केली, पण उपयोग काहीच नाही. आता मात्र आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे, असा आग्रह शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उर्जामंत्र्यांकडे धरला.

अधिक वाचाः नातेवाइकांचे रुसवेफुगवे टाळण्यासाठी लढविली नव्या पिढीची  ‘ही’ नवी शक्कल…
 

दीड वर्षांपासून अर्ज भरले...
आपला देश कृषिप्रधान देश म्हणून जगविख्यात आहे. शेतीला ओलीत करण्यासाठी विजेची नितांत गरज असते. मात्र मौदा तालुक्यात दीड वर्षांपासून  शेतकऱ्यानी वितरण कंपनीकडे  वीज जोडणी मिळावी याकरिता मागणी केली. मात्र अद्याप वीजजोडणी मिळाली नसल्याने चिंतेची बाब व्यक्त करण्यात येत आहे. याकरिता किसान अधिकार मंचच्या वतीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकरिता  तहसीलदार प्रशांत सांगडे  यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील  दीड वर्षांपासून अर्ज व डिमांड भरलेले आहेत. पण अद्यापही त्यांना वीजजोडणी मिळाली नाही. त्यांना शेतात अत्याआधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यमातून शेती करण्याकरिता वीजेची अत्यंत गरज आहे. पण डिमांड भरून सुद्धा त्यांना शेतात वीजजोडणी सेवा उपलब्ध न होणे ही अत्यंत बेजबाबदार आणि लाजिरवाणी बाब आहे.

अधिक वाचाः नागपूर हादरले! उच्चशिक्षित दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या

खापराच्या दिव्यामंधी कधी पेटणार वाती?
यावरून वितरण कंपनीचा किती भोंगळ कारभार आहे, ते दिसून येते.  तालुक्यात शेतकरी मागास असणे ही अत्यंत खेदाची बाब असून याला कुठेतरी शासन प्रशासन जवाबदार आहे.  तालुक्यातील शेतकरी हेसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रगतशील शेतकरी व्हावे याकरिता आपण तात्काळ योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जर प्रशासनाने समस्या लवकर न सोडविल्यास आम्हाला तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,व याला सर्वस्वी आपण व आपले प्रशासन जवाबदार राहील. असे निवेदनातून स्पष्ट केले आहे. निवेदन देताना किसान अधिकार मंचचे मुख्य संयोजक राम वाडीभस्मे,  मृणाल तिघरे, जगदीश वाडीभष्मे, शैलेश किरपान, सुरेंद्र वाडीभष्मे, राहुल नेउलकर, राहुल घरडे, रमेश रावते, सोमेश उके, शेषराव भाकरे, जनबा डोंगरे व यांच्यासह  शेतकरी होते.


संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT