The lockdown reduced pollution levels in Maharashtra 
नागपूर

एवढाच काय तो दिलासा, टाळेबंदीत राज्यातील प्रदूषण पातळी घटली

राजेश रामपूरकर

नागपूर  ः कोरोना काळात केलेल्या टाळेबंदीमुळे राज्यातील प्रदूषण पातळीमध्ये ३० ते ५५ टक्के घट झालेली आहे. मुंबई आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे वायुप्रदूषण शहराच्या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१९-२०२० चा अहवाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात ही माहिती पुढे आली आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर महाराष्ट्रातील प्रदूषणात घट झाला आहे. अहवालात एप्रिल ते डिसेंबर २०१९ आणि जानेवारी ते मार्च २०२० ची प्रदूषणाच्या आकडेवारीचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील घुग्गुस, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद ,नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, डोंबिवली, मुंबई, कल्याण, नवी मुंबई, कुर्ला, सायन, वरळी, मुलुंड, बांद्रा, कुलाबा, विलेपार्ले, कांदिवली, महापे, नेरूळ, सोलापूर ही औद्योगिक शहरे प्रदूषित क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. 

सर्व प्रकारच्या वायू प्रदूषण आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मुंबई आणि चंद्रपूर हे जास्त प्रदूषित विभाग ठरली आहेत, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे /यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाच्या आधारे दिली आहे.

देशातील एकूण २९ राज्ये आणि ३४४ शहरात ७९३ प्रदूषण मापन केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील २५ शहरात ८४ वायू गुणवत्ता मापन केंद्रे आहेत. त्यातील २३ हे सतत वायू गुणवत्ता मापन केंद्र आहे. मागील नऊ वर्षाचे या शहरातील प्रदूषण, कोरोनापूर्वी आणि नंतरच्या वायू प्रदूषणाची आकडेवारी दिलेली आहे.

सल्फर डाय आॅक्साइडचे मर्यादेपेक्षा अधिक प्रमाण कल्याण, डोंबिवली, बांद्रा, कुलाबा, कुर्ला चंद्रपूर या शहरात आढळले. नायट्रोजन ऑक्साइडचे अधिक प्रमाण चंद्रपूर, बांद्रा, कुर्ला, सायन, विलेपार्ले, वरळी, नाशिक, महावे आणि सोलापूर येथे अधिक आढळले. घुग्गुस, चंद्रपूर शहर ,सायन आणि नेरळ येथे अधिक प्रमाणात धुळीकण आढळले . 

कल्याण, पुणे, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नागपूर, कांदिवली, कुर्ला आणि मुलुंड येथे २.५ पेक्षा अधिक प्रमाणात सूक्ष्म धुळीकण आढळले. तर चंद्रपूर, कल्याण, महावे, मुलुंड आणि नागपूर या शहरातील ओझोनचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. नागपूर, बांद्रा, डोंबिवली, कल्याण, सोलापूर,आणि पुणे येथे मर्यादेपेक्षा अधिक आढळले कर्बवायूचे अधिक प्रमाण आढळून आले आहे.

 उद्योग, कोळसा जाळणे, विविध वायू जाळणे, वाहतूक, वाहने, कचरा जाळणे, बांधकाम, रस्त्यांची धूळ आणि घरगुती प्रदूषण असे वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत असल्याचेही प्रा. चोपणे यांनी म्हटले आहे.
 

  • जगातील अत्याधिक प्रदूषित २० शहरात भारतातील १४ शहरांचा समावेश
  • जगात दरवर्षी प्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू होतो
  • घरातील प्रदूषणामुळे ३८ लाख लोक मृत्युमुखी पडतात
  • भारतात दरवर्षी १२ लाख लोक प्रदूषणामुळे मृत्यू पावतात

संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT