Loss of farmer due to negligence of Irrigation Department 
नागपूर

अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात

पुरुषोत्तम डोरले

मौदा (जि. नागपूर) : तालुक्यातील सालवा-नानादेवी कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्यामुळे कुंभापूर येथील शेतकऱ्यांचा सुमारे २० एकरातील धान पूर्णपणे खराब झाला. विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले. शेतकरी पाटबंधारे विभागाला नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.

अगोदरच संकटात सापडलेला शेतकरी पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्णपणे उद्वस्त झाला आहे. मृग नक्षत्रापासून शेतकरी दुःख झेलत आहे. टोलधाड, अतिवृष्टी, नदीला महापूर, तुडतुडा यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. धान पिकाला लावलेला खर्च निघेल की नाही, याची चिंता वाटत आहे. पीक काही दिवसातच शेतकऱ्यांचा घरात येणार आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आनंदावर पाटबंधारे विभागाचे विरजण घातले.

पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाने सकाळपासून कापलेल्या धानातून पाणी वाहत आहे. वाळलेला धान पूर्णपणे ओळ चिंब झाला आहे. पेंच प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रकाश देशमुख यांना परिस्थिती जाणून घेण्यास फोन केला असता ते ‘नॉट रिचेबल’ दाखवित होता.

आवश्यकता नसतानाही सोडले पाणी
यावेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता नाही. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याची भरपाई मिळालाच पाहिजे. कन्हानवरून येणाऱ्या सालवा-नानादेवी-कालव्याला क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कालवा ज्याठिकाणी तुटलेला आहे, त्याची दुरुस्त करावी व पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
- देवेंद्र गोडबोले,
उपजिल्हाप्रमुख शिवसेना

योग्य चौकशी करण्यात येईल
परिसरातील शाखा अभियंता देशमुख यांना सूचना देण्यात आली आहे. ते पाहणी करीत आहेत. त्यांना तात्काळ पाणी बंद करण्यासाठी सांगितले आहे. नुकसानीची योग्य चौकशी करण्यात येईल.
- प्रवीण झाडे,
कार्यकारी अभियंता, पेंच प्रकल्प

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT