colleges sakal
नागपूर

नागपूर : केंद्रीय प्रवेशामुळे अनुदानित संस्थांवर संकट

केंद्रीय प्रवेश पद्धतीद्वारे (कॅप) अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी संपली असून आता तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू आहेत.

मंगेश गोमासे : @mangeshG_sakal

नागपूर : केंद्रीय प्रवेश पद्धतीद्वारे (कॅप) अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी संपली असून आता तिसऱ्या फेरीचे प्रवेश सुरू आहेत. यावर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने कनिष्ठ महाविद्यालयात चांगले प्रवेश होतील असा अंदाज होता. मात्र, परिस्थिती अगदी या उलट आहे. ४० हजार जागा रिक्त असल्याने वर्ग बंद करण्याचे प्रस्ताव शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कॅपमध्ये शहरातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ हजार ८७५ जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत ३३ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २९ हजार १८४ विद्यार्थ्यांनी ‘ऑप्शन फॉर्म’ भरले आहेत. दुसरी फेरी संपल्यावर १८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे ४० हजारावर जागा रिक्त आहेत.

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यास शिक्षक अतिरिक्त होतील. तर दुसरीकडे खासगी संस्थांना खर्च सहन करणे शक्य होणार नाही. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला माहिती दिली आहे.

२७ महाविद्यालये बंद होणार!

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीत शहरातील नामांकित व ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी कोचिंग क्लासेस सोबत टाय-अप केले आहे, अशा संस्थांत प्रवेश पूर्ण झाले आहे. सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या भरल्या आहेत. काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात अद्याप २० प्रवेशही झालेले नाहीत. कर्मचारी व प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कमीत कमी एका वर्गात ३१ विद्यार्थी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाल्याने शिक्षकांची नियुक्ती करणे व्यवस्थापनाला अडचणीचे होणार आहे. यामुळे १२४ अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांपैकी २७ कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याच्या स्थितीत आहे.

टाय-अपमुळे फावले

जुन्या व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात केवळ २५० रुपयांत प्रवेश मिळत असताना त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे काही खासगी व अल्पसंख्याक संस्थांत जागाही शिल्लक नाहीत. कोचिंग क्लासेससोबत ‘टाय-अप’ असल्याने या कनिष्ठ महाविद्यालयांत अधिकचे प्रवेश होतात. सर्वाधिक अडचण आर्टच्या कनिष्ठ महाविद्यालयांना आहे. कला शाखेकडे ओढा नसल्याने शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. कमी विद्यार्थ्यांमुळे कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न निर्माण होऊन वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागले, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT