Nagpur Citizens face problem to Power outage  sakal
नागपूर

नागपूर : ‘बत्ती गुल’ चा नागपूरकरांना संताप

उकाड्यात अघोषित भारनियमन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या तीन दिवसापासून शहरातील विविध भागात वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने नागपूरकरांमध्ये मोठा संताप आहे. मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात कधी रात्री तर कधी भर दुपारी वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विरोधात नागरिकांचा मोठा रोष निर्माण झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून खरबी, नंदनवन, वाठोडा, हिवरी नगर, सक्करदरा, रघुजीनगर, मानेवाडा, उत्तर आणि दक्षिण नागपुरातील बराचसा भाग, पूर्व नागपुरातील सुद्धा बराचसा भाग आधी भागात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. कुठे रात्री १२ वाजता वीज पुरवठा खंडित होणे, कुठे एक तास, कुठे दोन तर कुठे चार तास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू आहे. भर उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागपूर जिल्ह्यात खापरखेडा आणि कोराडीमध्ये वीज निर्मिती होते. त्यामुळे शहरात अखंडित वीज पुरवठा होण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र, ही अपेक्षा गेल्या तीन दिवसांपासून फोल ठरली आहे. रात्री कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली आहे. यात लहान मुलांसह वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. असाच प्रकार आणखी सुरू राहिल्यास महावितरण कार्यालयात नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

मंगळवारी १० मे रोजी रात्री महापारेषणच्या खापरखेडा येथील उपकेंद्रात वाढलेल्या वीज भारामुळे ‘वेव्ह ट्रॅप’च्या कंडक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे २२० किव्हो वीज वहन करणारी खापरखेडा- कन्हान लाईन साधारणतः ११.३० वाजताच्या सुमारास नादुरुस्त झाली होती. त्याचप्रमाणे वाठोडा आणि निर्मल नगर उपकेंद्रात सुद्धा समस्या उद्भवली होती. परिणामी वीज पुरवठा बाधित होऊन नागपूर शहर व ग्रामीण भागातील महावितरणच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागला असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

महावितरणचे सहकार्याचे आवाहन

वाढलेली प्रचंड उष्णता त्यामुळे एसी व कुलर्सचा वाढलेला मोठ्या प्रमाणातील वापर यामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्यामुळे मागील तीन दिवसात नागपूर शहरातील काही भागात वीज पुरवठा बाधित झाला होता. अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण तत्पर आहेच. परंतु, सध्याची स्थिती लक्षात घेता या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT