Nagpur Floods Esakal
नागपूर

Nagpur Flood : तातडीच्या मदतीत नियमांचा अडथळा

घरात ४८ तास पाणी राहण्याची अट पंचनामे सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी १० हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. त्यानुसार पंचनामे ही सुरू झालेत. परंतु, या मदतीसाठी किमान ४८ तास पाणी घरात राहण्याची अट आहे. शहरी भागात अतिवृष्टीनंतर १० ते १५ तासात पाणी ओसरले. त्यामुळे ही अट पीडितांना मदतीपासून बाधा आणणारी आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. रस्ते जलमय झाले. नदी, तलावात चालणारी बोट रस्त्यावर चालली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. लोक रात्रभर घरातील पाणी बाहेर काढत होते. पाण्यामुळे लोकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. अनेकांच्या दुकानातही पाणी शिरले.

त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. १० हजारांवर लोकांच्या घरात पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या नुकसानापोटी तात्पूरती मदत खावटीच्या माध्यमातून करण्यात येते.पाच हजार रुपयापर्यंतची ही मदत असते. शासनाही ही येत्या पावसाळ्यापुरती १० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुकानदारांना नुकसानासाठी ५० हजार नागरिकांना १० हजार रुपयांची मदत तात्काळ देण्याचे जाहीर केले आहे.

परंतु या नुकसानाच्या मदतीसाठी ४८ तास पाणी घरात, दुकानात राहणे आवश्यक आहे. अनेकांनी आपल्या घरातील, दुकानातील पाणी बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्या घरात पाणी नाही. २४ तासानंतर पंचनामे सुरू करण्यात आले. अनेकांच्या घरात पाणी नाही. त्यामुळे मदतीत नियमांचा अडथळा येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

अनेकांच्या घरात फक्त पुराचे अवशेष

अनेकांनी आपल्या घरातून पाणी बाहेर काढले. विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांनी तर कालच घर स्वच्छ केले. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी नाही. फक्त अवशेष म्हणजे ओलावा तेवढा आहे. त्यामुळे ओलावा गृहित धरून मदत देणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

अट शिथिल करणार?

केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या दुष्काळी संहितेत ही ४८ तासांची अट आहे. ही अट अतिशय जाचक आहे. या अटीमुळे अनेक जण लाभ, मदतीपासून वंचित राहतात. लोकांना खरच मदत द्यायची असल्यास ही अट शिथिल करण्याची गरज आहे किंवा या अटीच्या बाहेर जाऊन मदत करावी लागणार आहे. त्यामुळे शासन, प्रशासन काय भूमिका घेते, हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT