vegetables esakal
नागपूर

नागपूर : हिरवा वाटाणा २५०, कोथिंबीर १५० रूपये किलो!

हिवाळ्यातही भाजीपाला महागच,किचन बजेट बिघडले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हिवाळ्यात भाजीपाला उत्पादनासाठी पोषक वातावरण असते. परराज्यातून भाजीपाल्याची आवक वाढत असते. बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होऊन दर कमी होतात. मात्र, यंदा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिघडली आहेत. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही भाजीची आवक अद्यापही मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भाजीचे भाव चढेच आहेत. नोव्हेबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. भाजीची आवक वाढण्यासाठी डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर येणारा भाजीपाला पाण्यात वाहून गेला. परिणामी, भाजीपाल्याची कमतरता जाणवत आहे. ग्राहकांना वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. टोमॅटो आणि कोथिंबिरचे भाव सर्वाधिक वाढलेले आहे. टोमॅटो किरकोळ बाजारात १०० रुपये तर कोथिंबीर १५० रुपये किलोवर पोचले आहे. हिरवे वाटाणे सध्या दिल्लीवरून येत असून आवक कमी असल्याने त्याचे भाव प्रति किलो २०० ते २५० रुपये किलोवर पोचले आहे.

आवक कमी असल्याने सर्वच भाज्या किरकोळ बाजारात ६० ते १०० रुपये किलो झालेल्या आहेत असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

ठोक बाजारातील भाजीपाला दर (रुपये प्रति किलो)

कोथिंबीर - ८० रुपये ,वांगे ३० रुपये ,गवार शेंग - ३० रुपये ,मेथी - ४० रुपये ,हिरवी मिरची - ३० रुपये ,चवळी - ४० रुपये ,फुलकोबी - ४० रुपये ,पानकोबी १५ रुपये ,टोमॅटो - ८० रुपये ,भेंडी - ३० रुपये ,शिमला मिरची - ३० रुपये ,तोंडले - ३० रुपये ,कारले - ३० रुपये ,कोहळा - ३० रुपये ,दुधी भोपळा - १५ रुपये ,पालक - १० रुपये ,मुळा - २० रुपये ,ढेमस - ३० रुपये ,गाजर -३० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

SCROLL FOR NEXT