new session could begin in September 
नागपूर

... तर सप्टेंबरमध्ये होऊ शकते नव्या सत्राची सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणुमुळे देशभरात लॉकडाउन आहे. यामुळे देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. या परीक्षा घेणे आणि पुढील सत्राची सुरुवात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीने सप्टेंबरमध्ये नव्या सत्राची सुरुवात करावी, अशी सूचना केली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यालये आणि विद्यापीठाचे कामकाज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांची चिंता वाढली आहे. प्रत्येकाला लॉकडाउन कधी संपेल हा प्रश्‍न पडला आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन संपल्यावर विद्यापीठातील परीक्षा आणि नव्या सत्राची सुरुवात केव्हा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने किती दिवसांनी विद्यापीठ आणि महाविद्यालये उघडतील यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने समिती स्थापन केल्या आहेत. यासंदर्भात राज्यांनीही सर्वाधिकार याच समितीला दिला आहे. समितीकडून बऱ्याच गोष्टींचा विचार करून अहवाल तयार करीत अनुदान आयोगाकडे दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने परीक्षा आणि ऍकेडमिक कॅलेंडरवर विचार करणाऱ्या हरियाना केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. कुहड यांच्या अध्यक्षतेत असलेल्या समितीने सप्टेंबर महिन्यात नवे सत्र सुरू करण्याबाबत शिफारस केली. 

कारण, अजूनही सीबीएसई बारावीच्या 29 विषयाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे परिस्थिती सामान्य होताच बारावीची परीक्षा घेण्यात येईल. याचप्रमाणे जूनमध्ये जेईई मेन्स आणि नीट परीक्षा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या परीक्षा झाल्यावरच इतर प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल. आतापर्यंत जुलै महिन्यात ऍकेडमीक सत्र सुरू व्हायचे. पण, आता पहिल्यांदा हे सत्र लांबणार आहे.

दोन आठवड्यांत निर्णय

अनुदान आयोगाने दिलेल्या अहवालाच्या शिफारशींवर विचार करून दोन आठवड्यांत अनुदान आयोग निर्णय घेणार आहे. अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रक काढून कळविले आहे. लॉकडाउन हटल्यावर काही दिवसात परीक्षा सुरू होतील. या परीक्षा जवळपास दोन महिने चालतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT