No decision taken by Nagpur University on exam is offline or online sakal
नागपूर

ऑफलाइन की ऑनलाइनचा निर्णय केव्‍हा?

परीक्षा पंधरा दिवसांवर : विद्यापीठाचे ढिसाळ नियोजन; विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचे कुलगुरुंद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार विद्यापीठांमध्ये १ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते. मात्र, नागपूर विद्यापीठाद्वारे अद्याप परीक्षा ऑफलाइन की ऑनलाइन याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे, १ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा घेण्याचे ठरलेले आहे. त्यानुसार किमान महिन्याभरापूर्वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, हेच कळले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

अनेकांचे नियोजन फसले

विद्यापीठाच्या परीक्षा साधारणतः मार्चमध्ये सुरू होतात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात संपतात. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करीत असतात. विद्यापीठाने यापूर्वी १५ मे पासून परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे पालकांनी अनेक योजना आखल्या. मात्र, अद्याप परीक्षेबाबत निर्णय झाला नसल्याने त्या सर्व फसल्याचे दिसून येत आहे.

विभागांच्या परीक्षा केव्हा?

विद्यापीठाने विभागांना स्वायत्तता प्रदान केली आहे. त्यामुळे विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग नसेल. मात्र, त्यांच्या परीक्षा केव्हा होतील, याबाबत विभागांनाही माहिती नाही. त्यामुळे विभागातील विद्यार्थ्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात परीक्षा कशा घेणार?

विद्यापीठाच्या तारखा जाहीर झाल्यावर तब्बल तीन महिने परीक्षा चालणार आहेत. यामधील बरीच केंद्रे ही ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थी केंद्रांपर्यंत कसे पोहचतील, हा प्रश्‍न आहे. शहरी भागात सोयीसुविधा असल्या तरी ग्रामीण भागात अनेकदा संपर्क तुटतो. तेव्हा अशा परिस्थितीत परीक्षा निर्विघ्न कशा होतील हे कळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT