Nutrition of students will be at five rupees
Nutrition of students will be at five rupees 
नागपूर

पावणे पाच रुपयांत होणार विद्यार्थ्यांचे पोषण; शासनाचा अजब तर्क

नीलेश डोये

नागपूर : शाळेतील उपस्थिती वाढविण्यासोबतच सुदृढ आरोग्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी ४.४८ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज ६.७१ रुपयांचे धान्य वाट्याला येते. एवढ्या कमी पैशात पोषण होणार कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सुरुवातीला या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन रुपये किलोप्रमाणे मोफत तांदूळ घरपोच दिला जात होता. २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे, असे आदेश दिले. त्यानंतर २००२ पासून या योजनेचे स्वरूप बदलून विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देणे सुरू झाले.

२००८ मध्ये या योजनेचा विस्तार करून इयत्ता सहावी ते आठवीचा समावेश करण्यात आला. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या व उपस्थिती वाढवून गळती थांबविण्याचा उद्देश होता. सरकारी शाळांधील संख्या पाहता यात फारसे यश आल्याचे दिसत नाही.

धोरण तयार करणाऱ्यांची मुले याच्या पेक्षा जास्त रुपयांच्या अन्नाची नासाडी करीत असतील. केंद्र सरकारकडून मोफत तांदूळ प्राप्त होतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के निधी प्राप्त होतो.

असा मिळतो आहार

  • पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आहारात उष्मांक ४५०, प्रथिने, १२ ग्रॅम, तांदूळ १०० ग्रॅम, डाळी २० ग्रॅम व पालेभाज्या ५० ग्रॅम
  • इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उष्मांक ७००, प्रथिने २० ग्रॅम, तांदूळ १५० ग्रॅम, डाळी ३० ग्रॅम, पालेभाज्या ७५ ग्रॅम

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT