vegetables  Sakal
नागपूर

शिळा भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने; शेती करणे उठले जीवावर

शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा, असा गोरखधंदा केला जात आहे.

राम वाडीभस्मे

धानला (जि. नागपूर) : एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक व मानवी संकटांतून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला भाव मिळत नसल्याने मोहभंग होत आहे. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने विकत घ्यायचा आणि नंतर तोच शिळा झालेला भाजीपाला दुप्पट ते चौपट दराने विकायचा, असा गोरखधंदा केला जात आहे. घाम गाळून फुलविलेल्या भाजीपाल्याच्या अत्यल्प दरानेही शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेणासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघत आहे.

मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी शेतात सिंचनाची सुविधा करून पारंपारिक शेतीला आळा घालून भाजीपाला पीक घेत आहेत. लागवड ते बाजारपेठेपर्यंतचा भाजीपाल्याचा प्रवास मोठा कठीण आहे. तळहातावरील फोडाप्रमाणे जपल्यानंतर भाजीपाला कुठे बाजारपेठेपर्यंत पोहोचतो. वन्यप्राण्यांचा हैदोस, निसर्गाचा लहरीपणा, हवामान बदल यामधून बचावलेला भाजीपाला शेतकरी मोठ्या आशेने बाजारात आणतात. मात्र, येथे आल्यानंतर त्यांचा ताजा भाजीपाला मातीमोल भावाने हर्रासी पद्धतीद्वारे खरेदी केला जातो.

ठोक पद्धतीने शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात वांगे, टमाटे, कोबी, कारले, चवळी, गवार, भेंडी आदी भाजीपाला घेतला जातो. नंतर हाच भाजीपाला व्यापाऱ्यांकडून पाव, अर्धा किलो, एक किलो अशा स्वरुपात ग्राहकांना विकला जातो. सद्यस्थितीत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे या आकडेवारीवरून सांगते.

शेतकऱ्यांकडून ५-१० रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेली कारली नंतर ग्राहकांना २५ ते ३0 रुपये दराने व्यापारी विकतात. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत असल्याची ओरड होत आहे. प्रत्यक्षात मात्र या भावाचे दाम शेतकऱ्यांच्या खिशात जशास तसे जात नसल्याचे वास्तव आहे. समाधानकारक भाव नसल्याने फारसे उत्पन्न हाती येत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

प्रति किलो दराने खरेदी-विक्री

ठोक खरेदी रुपये व्यापारी चिल्लर विक्री रुपये

  • कारले ५ २५

  • चवळी १० ५०

  • वांगी ७ २०

  • भेंडी ५ २५

"मागील वर्षी चवळी हे भाजीपाला ५५ रुपये किलोपर्यंत ठोक बाजारात जात असल्याने मी पारंपरिक धान, कापूस व इतर पिकांना आळा घालून भाजीपाला पिकाकडे वळलो. आधी कमी असलेली शेती यंदा वाढवली. मात्र भाव नसल्याने निराशा हातात अली आहे."

- रामकृष्णा देवनेनी, प्रगतशील धानला

"माझ्याकडील कमी शेती असल्याने भाजीपाला शेतीकडे गेल्या काही वर्षांपासून वळलो. परंतु यंदाचे वर्ष तर मारक ठरले, लागवड खर्चही निघत नाही. आधीच कोरोनामुळे बरबादीचे लक्षण समोर आले. आता कसे सावराव हेच कुणाला ठाऊक.?"

- राजेश हटवार, भाजीपाला उत्पादक, दहेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT