मृत्यू 
नागपूर

अखेर त्याला काळानेच दिली शिक्षा; मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याचा कोरोनाने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः मुंबईत २००६ मध्ये रेल्वेच्या डब्यात प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवून आणत १८९ जणांचे बळी घेतल्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला काळानेच शिक्षा दिली. त्याला कोरोनाची बाधा झाली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमाल मोहम्मद अन्सारी (५०, बिहार) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल अन्सारी हा याला ताप आल्यानंतर ९ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच ८ एप्रिलला मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

रिपोर्ट येण्यापूर्वीच कमाल अन्सारीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात तो कोरोना बाधित निघाला होता. पहिल्या दिवशी ८ कैदी कोरोनाबाधित निघाले होते. नंतर ती संख्या १३ वर पोहचली. यामध्ये दोन फाशीच्या शिक्षेच्या कैद्यांचा समावेश होता.

कमाल अन्सारी याने जुलै २००६ मध्ये लष्कर ए-तोयबाने सीमीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मुंबईत रेल्वे साखळी बॉम्बस्फोट घडविले होते. यामध्ये १८९ जण मृत पावले होते तर तब्बल ८०० जण जखमी झाले होते. या प्रकरणात १२ पैकी पाच जणांंना फाशीची शिक्षा झाली होती. त्यामध्ये कमाल अन्सारी हा मुख्य आरोपी होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT