लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके
लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके  
नागपूर

गृहिणींनो, तळणाचे पदार्थ करताना हात आवरा; तेलाचे भाव भिडले गगनाला; लिटरमागे इतकी वाढ 

राजेश रामपूरकर

नागपूर ः एकीकडे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम असतानाच दुसरीकडे खाद्य तेलासह हरभरा, तूर डाळीचे भावही सतत वाढू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत शेंगदाणा, सोयाबीनसह पामतेलाचे भाव हे लिटरमागे ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता महागाईचा फटकाही सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लॉकडाउनचा फटका बसल्यानंतर त्यातून हळूहळू परिस्थिती सामान्य होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यात इंधन दरवाढीचा फटकाही नागरिकांना बसत आहे. स्वयंपाकघरात रोज लागणारे खाद्यतेलाचे भावही काही महिन्यांपासून चढेच असल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. सोयाबीन तेलाचे भाव कडाडले असून, २००० रुपये प्रति १५ किलो असलेले सोयाबीन तेल आता २१०० ते २१५० रुपयांवर तर शेंगदाणा तेलही २३०० ते २४०० रुपयांवर गेले आहे. दोन महिन्यांपूर्वी १५० रुपये प्रति लिटर या भावाने मिळणाऱ्या शेंगदाणा तेलासाठी सध्या १६४ रुपये मोजावे लागत आहेत.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाउन जाहीर केल्याने गेल्या आठवड्यात बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. तुरीचे उत्पादन कमी असल्याने तूरडाळीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यातही वाढ झालेली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ९५ रुपये किलो असलेली तूरडाळ आता १०२ रुपयांवर पोहोचली आहे. होळी पंधरा दिवसांवर आली असून बाजारात हरभरा डाळीची मागणी वाढल्याने प्रति किलो दोन रुपयांची वाढ झालेली आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

राज्यात खरीप हंगामात तुरीच्या रब्बी मोसमात हरभरा, मूग, उडदाचे उत्पादन चांगले झालेले आहे. राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र डाळीचे एकूण ४३,३० लाख टनापर्यंत उत्पादन होणार आहे. खरिपाच्या मोसमात १७.५४ लाख टन तर रब्बीच्या मोसमात २५ ते २६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

खरिपामध्ये तूरडाळीचे उत्पादन ११.७८ लाख टन, २.२७ लाख टन मूग आणि ३.९० लाख टन उडीद तर रब्बीच्या मोसमात हरभरा २४.६७ लाख टन, उडीद २.५८ लाख टन तर मूग २.२७ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने हरभऱ्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT