Students are confused as exams are on janta curfew day  
नागपूर

जनता कर्फ्युत कशी देणार स्पर्धा परीक्षा.. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संभ्रमात

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे लाखोंचे रोजगार गेलेत. याशिवाय स्पर्धातम परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बराच परिणाम झाला आहे. अनेक दिवसांनंतर १९ आणि २० सप्टेंबरला ‘आयबीपीएस आरआरबी‘ ची परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, याच दिवशी महानगरपालिकेने जनता कर्फ्यु लावल्याने परीक्षा द्यायची कशी हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मृत्यूसंख्याही वाढल्याने शहरात काही दिवसाची टाळेबंदी करावी असा विचार समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी याला नकार दिला तरी महापालिकेकडून खबरदारी म्हणून जनता कर्फ्यु लावण्याबाबत विचार करण्यात येत होता. आज महापौर संदीप जोशी यांनी 19 आणि 20 तारखेला जनता कर्फ्यु जाहीर केला. 

मात्र, 19,20 आणि 23 तारखेला रिजनल रुरल बॅंकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत ‘ऑफिस असिस्टंट' पदाकरिता परीक्षा घेण्यात येणार आहे. या मध्ये नागपुरात अनेक परीक्षा केंद्रे विद्यार्थांना देण्यात आहे आहेत. नागपुरात वाडी, बेलतरोडी आणि हिंगणा येथे परीक्षा केंद्रे आहेत. शहरातील असंख्य विद्यार्थी ही परीक्षा देणार असून जनता कर्फ्यु असल्याने परीक्षेला जायचे कसे ? असा प्रश्न विद्यार्थांना पडला आहे.

विशेष म्हणजे नागपुरातील जवळील गावावरील स्पर्धात्मक परिक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षेकरिता नागपूरला येतात. जनता कर्फ्यु मुळे या सर्व विद्यार्थांची गैरसोय होवु शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देत येणे शक्य होणार नाही. याप्रकारे विद्यार्थ्यांची रोजगाराची संधी हुकण्याची भिती आहे.

महापालिकेने सोय करावी

जनता कर्फ्युमुळे शहरात वाहतुक बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक दिवसानंतर विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा देता येणे शक्य झाले आहे. मात्र, या परीक्षेला विद्यार्थी मुकल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासने योग्य ती सोय करुन विद्यार्थांना परीक्षा केंद्रापर्यत पोचविण्याची सोय करावी अशी मागणी डाँ. राममनोहर लोहिया वाचनालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी सुबोध चहांदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT