nana patole criticized amitabh bachchan and akshay kumar in bhandara 
विदर्भ

'अमिताभ बच्चन अन् अक्षय कुमारचे शूटींग बंद पाडू, मोदी सरकारच्या विरोधात त्यांची टीवटीव का थांबली?'

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे काँग्रेसचे सरकार होते त्यावेळी टीवटीव करत होते. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना लोकशाहीच्या मार्गाने टीका करत होते. आता मोदी सरकार इतके अत्याचार करत आहेत. मात्र, हे दोन्ही अभिनेते गप्प का बसले आहेत? आता देखील त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात टीवटीव करायला पाहिजे. आम्ही त्यांचे महाराष्ट्रातील शूटींग बंद पाडू, असा इशारा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आज भंडाऱ्यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्यालाच पाठिंबा देण्यासाठी आज भंडाऱ्यात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते.
दरम्यान, काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर सर्वाधिक अत्याचार झाले आहे. काँग्रेसला शेतकऱ्यांचा कधीच कळवळा नव्हता. काँग्रेस ही शेतकऱ्यांसाठी नेहमी पुतणा मावशीच राहिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी असे बोलू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

तसेच विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील नाना पटोलेंवर टीका केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद पहिल्यांदा मिळाल्यामुळे नाना पटोले मोठ्या सेलिब्रिंटींवर टीका करून पब्लिसिटी स्टंट करत असलायचे दरेकर म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT