Sharad Pawar 
विदर्भ

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला. 

(सौजन्य : सोशल मीडिया)
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.. हे सरकार पाच वर्षे टिकावे म्हणून आपण स्वतः लक्ष घालू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. याकरिताच शिवसेनेसोबत आघाडी करताना किमान समान कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विकासाभिमुख धोरणे राबविण्याबरोबरच रोजगारासंबंधीच्या समस्या आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची आमची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री कोण राहील आणि सरकार केव्हा स्थापन होईल, हे मी सांगू शकत नाही. तीनही पक्षाचे नेते एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. तेच काय ते ठरवतील. मात्र, सरकार पाच वर्षे टिकेल आणि मध्यावधीची कुठलीही शक्‍यता नसून, पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करू,'' असेही पवार यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा करीत आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी त्यांना चांगला ओळखतो. ते भविष्यवेत्तेसुद्धा आहेत. प्रचारादरम्यान ते "मी पुन्हा येणार ...मी पुन्हा येणार...' असे सांगत होते. आता भाजपचे सरकार येणार असे म्हणत आहेत.'' असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT