no change in shop open timing in amravati corona update 
विदर्भ

कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाले, मात्र दुकानांची वेळ जैसे थे

सुधीर भारती

अमरावती : गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यानंतर विविध व्यापारी संघटनांनी दुकानाची वेळ वाढविण्याची मागणी केली. मात्र तूर्तास तरी जैसे थेच परिस्थिती राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे. 

वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून दोन आठवड्यांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून लॉकडाउन उठविण्यात आला आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचा इशारा देत दुकानांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत निर्धारित करण्यात आली. त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसायले लागलेत. मात्र, अमरावतीच्या बाजारपेठेत ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठी आहे. गावातून शहरात येईपर्यंत ही वेळ होऊन जाते आणि व्यापाऱ्यांसह दुकानदारांना नुकसान होते, असा मुद्दा व्यापारी संघटनांनी उपस्थित करीत सकाळी 11 ते रात्री सात किंवा आठपर्यंत बाजारपेठेला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, तूर्तास तरी वेळ न बदलविण्याच्या मानसिकतेमध्ये जिल्हा प्रशासन दिसून येत आहे.

काळजी सर्वांत महत्त्वाची -
मागील दोन-तीन दिवसांत रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट दूर झाले असे होत नाही. शहरातील बाजारपेठ, दुकाने, व्यवसायांना शिस्तबद्ध पद्धतीने टप्प्याटप्याने वेळ वाढवून दिला जाईल. मात्र, तूर्तास तरी ती वेळ अजून आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून निर्धारित केलेल्या वेळेवरच दुकाने सुरू आणि बंद होतील. 
-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT