Only wheat and rice in the Akola Market Committee! 
विदर्भ

बाजार समितीमध्ये फक्त गहू आणि तांदूळ!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अन्नधान्याच्या उपलब्धतेची असुविधा होऊ नये, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु वाहतूक अडचणीमुळे आवकेवर मोठा परिणाम दिसून येत असून, आठवडाभरापासून बाजार समित्यांमध्ये केवळ गहू व तांदुळाची आवक होत आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी तसेच सामाजिक दुरावा ठेवण्यासाठी एसटी, रेल्वे वाहतूक  व्यवस्था बंद करण्यात आली. जागोजागी रस्ते सुध्दा अडविण्यात आले आहेत. परंतु नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी काही व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अन्नधान्याची उपलब्धता व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोना इफेक्ट आणि लॉकडाऊनचा परिणाम बाजार समितीमधील अवकेवर झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन पूर्वी बाजार समित्यांमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, गव्हाची आवक बऱ्यापैकी सुरू होती. परंतु, गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून केवळ तांदूळ व गव्हाची आवक होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT