shetkari andolan 
विदर्भ

कृषी विधेयकाविरोधात संघटना एकवटल्या; मंगळवारी बंदची हाक 

सुधीर भारती

अमरावती : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली येथे ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी (ता. आठ) देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला किसान संघर्ष समितीसह विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून बंद यशस्वी करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. 

मंगळवारी आयोजित भारत बंदमध्ये काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी आपला पाठिंबा दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी सरकारने लोकसभेत कुठल्याही संघटनांशी चर्चा न करता कृषीविषयक कायदे संमत करून घेतले.

या कायद्यामुळे शेतमालाला आपल्या हक्काचा बाजार असणार नाही. हजार समित्या रिकाम्या होतील, हे कायदे शेतकऱ्यांना संपविणारे असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. मंगळवारी सकाळी १० वाजता स्थानिक इर्विन चौकात समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पत्रकार परिषदेला तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, अलीम पटेल, सुभाष पांडे, ऍड. सिद्धार्थ गायकवाड, जे. एम. कोठारी, चंद्रकांत बानुबाकोडे, भय्यासाहेब निचळ, सलीम मिरावाले आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा 

दिल्लीतील किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शेतकरी आंदोलनातील सर्व मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी संजय ठाकरे, सुयोग वाघमारे, शरद काळे, सुजाता शेळके, मनोज सोळंके, अजिंक्‍य पाटील, दीपक लोखंडे, कुणाल गावंडे आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.

प्राथमिक शिक्षकांचा पाठिंबा 

मंगळवारी आयोजित भारत बंदला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही पाठिंबा दिला आहे. शिक्षकांनी आपले कामकाज सांभाळून स्थानिक पातळीवर या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उदय शिंदे, विजय कोंबे, शिवाजी साखरे, राजन कारेगावकर, केदू देशमाने, राजेंद्र नवले, सयाजी पाटील, शिवाजी दुशिंग, आबा शिंपी, राजेश सावरकर आदी पदाधिकाऱ्यांनी केले. 

भारत बंदमध्ये व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे 

केंद्राने आणलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये प्रत्येक नागरिकासह व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यातील सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यामध्ये पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार सुलभा खोडके व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. आठ) महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ९ वाजता राजकमल चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 


संपादन ः राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT