file photo 
विदर्भ

महावितरणच्या जनजागृतीचा परिणाम: दीड हजार कोटींचा वीजबिलांचा भरणा 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर :  मार्च महिन्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरले. त्यामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत विदर्भातील ३५ लाख ३९ हजार २०० ग्राहकांनी १ हजार ४५४ कोटी रुपयांचे वीजबिल भरली. वीजबिलांचा भरणा करण्याबाबत महावितरण कंपनीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. त्याचा हा परिणाम आहे. 
लॉकडाउनमुळे रिडींग न घेता आल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांना तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल पाठविले होते. अवाढव्य आलेल्या वीजबिलांबाबत ग्राहकांच्या मनात संशय होता. तो दूर ग्राहकांशी प्रत्यक्ष तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क, ग्राहक मेळावे, वेबिनार, विशेष मदत कक्ष,लोकप्रतिनिधी व परिसरातील ग्राहकांसाठी माहिती देण्यासाठी व्हॉट्‌स ऍप ग्रुप या शिवाय ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस व बिल तपासण्यासाठी वेबलिंक आणि वीज बिलवर बिलाची संपूर्ण माहिती या प्रभावी उपाययोजना केल्या.

नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत एकूण २६६ वेबिनार व १ हजार ७७८ विशेष मदत कक्ष उभारण्यात आले. त्याचा लाभ १ लाख ७५ हजार ग्राहकांनी घेतला. या सर्व उपाययोजनांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येत वीजबिलांचा भरणा केला आहे. २ टक्‍के सवलतीसह बिल भरण्यासाठी हप्तेही पाडून देण्यात आले. त्यामुळे विदर्भातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील ३५ लाख ग्राहकांनी १ हजार ५४५ कोटी रुपयांचा वीज बिलांचा भरणा केला आहे. १ एप्रिल ते २८ जुलै या काळात नागपूर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर परिमंडलात सर्वाधिक सुमारे १५ लाख ६ हजार ५२० ग्राहकांनी ८६९ कोटी, चंद्रपूर परिमंडळात ५ लाख ६१ हजार ७५० ग्राहकांनी २१९ कोटी, अमरावती परिमंडळात ५ लाख ८६ हजार ४१० ग्राहकांनी १९७ कोटी , गोंदियात ४ लाख ११ हजार ३४० ग्राहकांनी ११५ कोटी आणि अकोला परिमंडलातील सुमारे ४ लाख ७३ हजार २०० ग्राहकांनी १४३ कोटी एवढा वीज बिलांचा भरणा केला आहे. 

  
 -संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT