विदर्भ

गावखेड्यात मास्कविनाच जनतेचा वावर; कोरोनाच्या संसर्गाने घेरले; काणाडोळा ठरतोय घातक

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना ग्रामीण भागातील नागरिकांनी उपाययोजना केल्या. त्यामुळे गावाच्या शिवेबाहेरच कोरोनाला रोखण्यात यश आले. दुसऱ्या लाटेत मात्र, गावखेड्यातील जनता मास्कविनाच घराबाहेर पडत आहे. त्यांचा हाच बिनधास्त वावर धोकादायक ठरत आहे.

कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या शहरी भागात निघत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आता ग्रामीण भागात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाचशे लोकवस्तीच्या गावात शंभर बाधित निघत आहेत. "आम्हाला कसला होतोय कोरोना, कोरोना बिरोना काहीच नाही', असा सूर आवळणाऱ्या गावातील जनतेला दुसऱ्या लाटेत चांगलाच धक्का बसला आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनच्या काळात गावखेड्यात सर्वांनीच पुढाकार घेत गावबंदी केली.

अनोळखी सोडाच ओळखीच्या व्यक्तीलाही गावात प्रवेश देण्यात आला नाही. आरोग्य विभागाच्या पथकाला माघारी पाठवत असताना गावात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिक बिनधास्त झाले. ग्रामीण भागात विवाह, साक्षगंध या समारंभात चिंताजनक गर्दी झाली. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची सुरक्षा पाळल्याचे दिसले नाही.

अनेकांनी मास्क केवळ शोभेपुरताच वापरण्याला प्राधान्य दिले. कामानिमित्त बाहेर गेल्यास दंडात्मक कारवाईच्या भीतीने मास्क लावण्यात येत होता. जिल्ह्यात शेकडो गावात बाधितांची संख्या निघत असतानाही गावखेड्यातील नागरिक तितक्‍या गांभीर्याने मास्क वापरताना दिसत नाहीत. मिळेल तेथे बसून गप्पाचा फड रंगविला जात आहे. नागरिकांचा घोळका एकत्र असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. हाच कानाडोळा ग्रामीण भागासाठी घातक ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गेल्या वर्षी जी काळजी घेतली. ती आता घेतल्यास संसर्गाला आळा बसेल, असे मत सुज्ञव्यक्ती व्यक्त करीत आहेत.

चोरट्या मार्गाने प्रवास

कडक निर्बंध असल्याने वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त राहत असल्याने चोरट्या मार्गाचा प्रवासासाठी वापर केला जात आहे. खासगी वाहनात अक्षरशः: कोंबून नागरिक प्रवास करतात. सामाजिक अंतराचा पुरता बट्ट्याबोळ तर उडतोच, शिवाय प्रवासादरम्यान कुणीही मास्क वापरत नाही. हे धक्कादायक चित्र मंगळवारी (ता.27) सकाळी नऊच्या दरम्यान जांब रोडवर दिसले. वाहनातील गर्दी बघून अनेकांनी प्रवासाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT