The problem of online education in rural areas is not solved education in gadchiroli 
विदर्भ

धोका! मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढणार; शैक्षणिक नुकसान

संतोष मद्दीवार

अहेरी (जि. गडचिरोली) : कोरोनाचे संकट उद्‌भवून जवळपास वर्ष लोटत आले आहे. अद्याप कोरोनाचे संकट टळले नसून याचा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अतिमागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भ्रमणध्वनीसेवासुद्धा पोहोचलेली नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या समस्या कायम आहे. कोरोनामुळे मुले शाळाबाह्य होण्याचे प्रमाण वाढणार, असे दिसून येत आहे.

देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने एक-एक क्षेत्र अनलॉकदेखील करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत लहान मुलांना आजाराचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांद्वारे जाहीर होताच सर्वप्रथम सर्व शाळा लगेच बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, अनलॉक करताना मात्र शाळांचा क्रमांक शेवटी लागला.

किंबहुना अद्याप पूर्णपणे अनलॉक झालेदेखील नाही. सध्याची परिस्थिती बघता चालू सत्रात शाळा सुरळीत सुरू होण्याची चिन्हे दूरवर दिसत नाहीत. यासर्व घडामोडींमध्ये सर्वांत जास्त नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे झाले. विशेषत्वाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले ते भरून न निघण्यासारखे आहे.

नागरी भागात ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमाने कमी अधिक प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व किमान शिक्षणाशी संबंध टिकून तरी आहे. मात्र, ग्रामीण व दुर्गम भागातील बहुतांश विद्यार्थ्यांची लय पूर्णपणे तुटलेली आढळते.

गरिबी व अपुऱ्या साधनांमुळे शिक्षण बंदच होते. माध्यमिक स्तरातील नववी व दहावी इयत्ता सुरू करण्यात आल्या. परंतु, विद्यार्थी व पालकांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कोविडची आता विशेष भीती राहिली नाही. परंतु, शाळेची सवयच पूर्णपणे मोडल्याने विद्यार्थ्यांची पावले शाळेकडे वळत नाहीत.

लॉकडाउन आणि घरची जेमतेम परिस्थितीमुळे मुलांना वर्षभर शेतकाम अथवा मजुरीवर जावे लागले. आतासुद्धा शेतात कापूस वेचणे, धानाची बांधणी, विक्री आदी कामांवर भरघोस मजुरीच्या लालसेने विद्यार्थी शाळेऐवजी मजुरीचाच पर्याय निवडत आहेत. हुशार असो अथवा ढ असो, सगळ्यांची पावले मजुरीकडे वळत आहेत. ही अतिशय दुःखाची बाब आहे. रोज नीटनेटके व टापटीप होऊन शाळेत येणारे विद्यार्थी गबाळ्यासारख्या अवस्थेत मजुरी करताना शिक्षकांनासुद्धा बघवत नाहीत.

शिक्षकांच्या आवाहनाला मिळणारा नकार व लॉकडाउनच्या काळात शिक्षणाबद्दल निर्माण झालेली प्रचंड अनासक्ती बघता येत्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांची पावले पुन्हा शाळेकडे वळावीत यासाठी सर्वच स्तरावरून व व्यापक प्रमाणात उपाययोजना करणे आवश्‍यक झाले आहे.

नव्या वर्षाकडून आशा

मागचे २०२० वर्ष सर्वांसाठीच अतिशय वाईट गेले. पाखरांनी गजबजलेल्या वृक्षांसारख्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलणाऱ्या शाळा वर्षभर ओसाडच राहिल्या. खरेतर हेच विद्यार्थी देशाची भावी पिढी आहेत. ही भावी पिढी सुशिक्षित व ज्ञानसंपन्न होण्यासाठी कोरोनामुळे थांबलेला शिक्षणाचा प्रवाह पुन्हा मोकळा व्हावा, हीच आशा सर्वजण या नववर्षाकडून करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT