https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/education-board-given-important-instructions-9th-12th-class-301532 
विदर्भ

पाऊस, जागा, मजूर समस्येची बाधा अन्‌ संतप्त शेतकऱ्यांचा देवळीत राडा

सकाळ वृत्तसेवा

देवळी (जि. वर्धा) : पावसाचे सावट, खालावलेली आर्थिक स्थिती आणि सीसीआयकडून खरेदीसाठी होत असलेली ढिलाई यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी कापूस खरेदी केंद्रावर चांगलाच राडा घातला. यामुळे बराच काळ खरेदीचा खोळंबा झाला होता. जिनिंग मालकाने खरेदीसाठी नकार देताच शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. 

संतापलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष राजीव बकाणे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. शेतक्‍यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी घटनास्थळ गाठत सीसीआयच्या स्थानिक व्यवस्थापकांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढला. सायंकाळी चार वाजेपर्यंत सीसीआय संचालक, पोलिस आणि शेतकऱ्यांत चर्चा सुरूच होती. शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे आणि संचालक अयुब अली यांनी जिनिंग मालकासोबत चर्चा करून यावर तोडगा काढला.

आभाळात ढग होते. पण, पावसाचे संकेत नसल्याने शेतक्‍यांनी गाड्या भरून कापूस बाजारात आणला. यावेळी सीसीआयचे खरेदी केंद्र असलेल्या जिनिंग मालकाने पाऊस, मजूर आणि जागेची समस्या लक्षात घेत खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या.

रस्तारोकोमुळे वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आंदोलनाची माहिती होताच पोलिस प्रशासन दाखल झाले. ठाणेदारांनी सीसीआयचे व्यवस्थापक आणि जिनिंग मालकांना या समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यात सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांची ताटकळ झाल्याने त्यांचा संताप अनावर होत होता.

अखेर या सर्व प्रकाराची माहिती बाजार समितीचे संचालक अयुब अली पटेल यांना मिळाली. त्यांनी प्रथम जिनिंग मालकाशी चर्चा केली. परंतु, त्याचा काहीच लाभ होत नसल्याचे दिसून आले. सभापती मनोहर खडसे यांनी जय बजरंग ऍग्रो प्रोसेसचे अमित खुराणा यांना बोलावून गाड्या खाली करण्याबाबत सूचना केल्यावर टोकण असलेल्या गाड्या घेण्यास सुरुवात झाली. 

अधिकाऱ्यांची उपस्थिती

शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीची समस्या निर्माण झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार देशमुख, बाजार समितीचे संचालक अमोल कसनारे, देवानंद भगत, यांनी समस्या सोडविण्याकरिता सहकार्य केले. 

त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

रोहणी येथील शेतकरी रमेश वामन लंगोटे हे तीन दिवसांपासून सारखी गाडी आणत असून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. यामुळे त्यांनी थेट आणलेला कापूस आणि स्वत: पेटवून घेतो अशी धमकी दिली. उज्वल निवल रा. मोमीनपूर, वासुदेव कांबळे रा. कात्री, हरिभाऊ उमरे रा. वाबगाव, बंडू वसू रा. रोहणी यांनी व्यथा व्यक्त केल्या.

प्रत्येक जिनिंगमध्ये वीस गाड्या

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता येथे आलेल्या टोकन असलेल्या गाड्या खाली करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सीसीआयची खरेदी सुरू असलेल्या चारही जिनिंगमध्ये कापूस गाड्या खाली करण्याची व्यवस्था करण्यात आली. एका जिनिंगमध्ये वीस गाड्या पाठविण्यात आल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT