Recommendation may demolished OBC reservation  
विदर्भ

या समितीच्या शिफारशी ओबीसींसाठी ठरणार घातक... आरक्षणावर गदा?

प्रमोद काळबांडे

नागपूर : केंद्रशासनाच्या कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालयाच्या (मिनिस्ट्री ऑफ पब्लिक ग्रिव्हिएन्सेस ऍण्ड पेन्शन) वतीने आठ डिसेंबर 1993 मध्ये ओबीसी प्रवर्गासाठी उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गट (क्रिमिलेअर) वगळण्याबाबतचे निकष व कार्यपद्धती ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार क्रिमिलेअरची मर्यादा एक लक्ष ठरविण्यात आली होती. पुढे 2004 ला 2.5 लक्ष, 2008 ला 4.5 लक्ष, 2013 ला 6 लक्ष आणि 2017 ला 8 लक्ष करण्यात आली. परंतु त्यात वेतनापासून व शेतीपासून मिळणारे उत्पन्न वगळण्यात आले होते.

परंतु 8 मार्च 2019 ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाणे निवृत्त सनदी अधिकारी भानुप्रसाद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. आधीच्या निकषाला या समितीने डावलले आहे. या समितीने ओबीसींसाठी एक अत्यंत घातक शिफारस केली आहे. ती शिफारस म्हणजे "वेतनापासून व शेतीपासून मिळणारे उत्पन्न पकडण्यात यावे' ही आहे. या संबंधाने अहवालसुद्धा सादर केला आहे.

`ओबीसी' संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार गणेश सिंग यांनी दिनांक 9 मार्च 2019 ला लोकसभेच्या अध्यक्षांकडे सादर केलेला अहवाल मान्य करावा. तसेच भानुप्रसाद शर्मा समितीने केलेल्या दिलेला अहवाल पूर्णतः रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संघटनेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष, डॉ. खुशालचंद्र बोपचे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी केली आहे.

ओबीसी संघटनांतर्फे निवेदने
यासंबंधाने ठिकठिकाणी निवेदने देण्यात येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे एक शिष्टमंडळाने नुकतेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले. भानुप्रसाद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समिती रद्द करावी. त्यांच्या शिफारशी लागू करू नये, अशी मागणी या निवेदनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंग व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष भगवानलाल साहानी यांना केली आहे. शिष्टमंडळात ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रणजीत डवरे, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, संजय कौरासे उपस्थित होते.

ओबीसींसाठी घातक शिफारशी, आरक्षण संपुष्टात येणार
केंद्र सरकार "क्रिमिलिअर'ची मर्यादा 12 लक्ष करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी वेतन व शेतीपासून मिळणारे उत्पन्न यात सामील केल्यास केंद्रातील व राज्यातील अनेक वर्षे तीन व चार पदावर असणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी हा निर्णय घातक ठरणार आहे. म्हणजेच ओबीसी वर्ग आरक्षणापासून वंचित राहणार आहे.
-सचिन राजूरकर
सचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

(संपादन- नीलेश डाखोरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT