farmer in buldana district.jpg 
विदर्भ

अरे देवा! ‘त्या’ माऊलींना जीव धोक्यात घालून गाठावे लागते शेत शिवार; खते, बी-बियाणे नेण्यासाठी तर...

मोहम्मद मुश्ताक

चांडोळ (जि.बुलडाणा) : मृग नक्षत्राच्या जोरदार आगमनाने शेतकऱ्यांचा रस्ताच पाण्याखाली गेल्याने रस्त्याअभावी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होत आहे. पेरणीसाठी जाताना जीव मुठीत घेऊन शेत शिवार गाठावे लागत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. खते, बी-बियाणे नेण्यासाठी शेतकऱ्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पावसाच्या दमदार आगमनाने जगाचा पोशिंदा बळीराजा राजा आनंदित तर झाला. परंतु त्या आनंदावर रस्त्याने विरजण घातले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. चांडोळ ते बोदेगाव रस्त्यातील नदीवर टाकण्यात आलेला सिमेंट बांधाऱ्यामुळे संपूर्ण रस्ता जलमय झाला असून त्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. तसेच बहुसंख्य शेतकरी हे शेतात राहतात परंतु रस्ता जलमय झाल्याने त्यांचा गावातील संपर्क तुटला आहे.

सध्या कोरोना विषाणूमुळे शाळेला सुट्ट्या आहे अन्यथा लहान चिमुकल्यांना सुद्धा शाळेत न जाता घरी राहण्याची वेळ आली असती. शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेती उपयोगी साहित्य नेण्यास तारेवरची कसरतच करावी लागत आहे. कारण रस्त्यावर जवळपास चार ते पाच फूट पाणी साचलेले आहे. रस्त्याअभावी महिला व लहान चिमुकले तर घरातच अडकून पडलेले आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना पर्यायी उपाय उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन ही देण्यात आले होते.

शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या बिकट परिस्थिती पासून मुक्त करण्याची मागणी करीत आहे. यावेळी युवराज छानवाल, राजू धनावत, प्रतापसिंग छानवाल, हुकुमसिंग छानवाल, रणजित छानवाल, गजानन राऊत, मर्दांसिंग कवाळ, सुभाष पाचरणे, संदीप राऊत, सतीश रेकनोत, गजानन ब्राम्हणे, जीवन द्यावणे, लिंबाजी राऊत, दिपक सोनुने, सुभाष महेर, विठ्ठल धणावत तसेच त्या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

...अन् महिला थोडक्यात बचावली
बुधवार रोजी पेरणीसाठी पाण्यातून जात असताना अचानकपणे पाणी वाढल्याने लक्ष्मीबाई छानवाल हे पाण्यात पडल्याने अंगाचा थरकाप उडाला होता.परंतु शेतात जाण्यासाठी मागून आलेला त्यांचा पुतण्या राजू छानवाल याने लक्ष्मीबाईंना पाण्याबाहेर काढले.तेव्हा ते निःशब्द झाले होते अशी प्रतिक्रिया पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतःच लक्ष्मीबाईंनी  सकाळशी बोलताना दिली.

एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण?
शेतकरी राजावर रस्त्यामुळे कोणतेही संकट येऊ नये तसेच त्याची वाट न पाहता शेतकर्‍यांसाठी रस्त्याची दुरुस्ती संबंधित विभागाने लवकरात लवकर करून देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : मुंबईत काँग्रेसचा ‘वोट चोरी’ घोटाळ्याचा आरोप

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT