Sharad Pawar Sharad Pawar
विदर्भ

‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : त्रिपुरामध्ये घडलेली दंगल अमरावतीमध्ये पेटण्याची कारण काय होते? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. धर्म, जाती, भाषा यावरून समाजात फूट पडू नये. मात्र, काही विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. देश एकसंघ ठेवायचा असेल तर दंगली घडविणाऱ्या लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे जाता काम नये. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (ग्रामीण) मूल येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (ता. १८) आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठी झळ पोहोचली आहे. ओबीसीची घटलेली टक्केवारीसुद्धा पूर्ववत आणण्यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा देणार आहे. काही नेते सोडून गेले. त्यांची चिंता करू नका. मा. सा. कन्नमवारांचा जिल्हा राष्ट्रवादीचा होईल, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. याप्रसंगी संपर्क आणि ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सुबोध मोहिते, मधुकर कुकडे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेंद्र जैन, अशोक जीवतोडे, शोभाताई पोटदुखे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT