small boy abducted from Amravati 
विदर्भ

विवाहिता प्रसूतीसाठी माहेरी आली अन् दीड महिन्याच्या चिमुकल्याला गमावून बसली; भर दुपारी अपहरण

संतोष ताकपिरे

अमरावती : शहरातील न्यू प्रभात कॉलनीतील आपल्या माहेरी आलेल्या महिलेच्या अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्याचे घरातून अपहरण झाले. भर दुपारी दीड वाजताच्या सुमारास रविवारी (ता. २९) ही घटना घडली. नातेवाईकांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण यांची विवाहित मुलगी प्रसूतीसाठी अमरावतीत आली होती. तिने एका मुलाला जन्म दिला. महिलेचे आई-वडील एका समारंभासाठी बाहेर गेले होते. घटनेच्या वेळी भाऊ एका खोलीत टीव्ही बघत होता. महिला मुलासह दुसऱ्या खोलीत होती.

महिला बाथरूममध्ये गेली असताना त्याच वेळी कुणीतरी लहान दीड महिन्याच्या मुलाला घरातून पळवून नेले. महिला रूममध्ये आली असता तिला तिचे दीड महिन्याचे बाळ दिसले नाही. या घटनेची माहिती तिने वडिलांना दिली. वडील चव्हाण घरी परत आले.

त्यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. भरदुपारी दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण कुणी व कशासाठी करावे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उशिरा रात्रीपर्यंत बाळाचा शोध लागू शकला नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT