The student went to the high court after getting zero marks 
विदर्भ

छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा असताता शून्य गुण कसे मिळणार, विद्यर्थिनी गेली हायकोर्टात

मंगेश गोमासे

नागपूर : नीटच्या परीक्षेत अगदी शून्य गुण मिळालेल्या विद्यर्थिनीने मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात धाव घेत दाद मागितली आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावून २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागविले आहे. वसुंधरा भोजने असे विद्यर्थिनीचे नाव आहे.

वसुंधरा ही अमरावतीची रहिवासी आहे. तिने दहावीत ९३.४ तर बारावीत ८१.८५ टक्के गुण पटकावले. नीटचा पेपरही चांगला गेला होता. एकूण ७२० गुणांच्या परीक्षेत ६०० हून अधिक गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होती. पण, १६ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या निकालात तिला शून्य गुण दाखविण्यात आले. तांत्रिक घोळातून हा प्रकार झाला असावा असी तिचा कयास आहे.

निकालाच्या दिवशीच तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलद्वरे निवेदन पाठवून चूक दुरुस्तीची मागणी केली. परंतु, कोणताच प्रतिसाद मिळाली नाही. परिणामी तिने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्या. अतुल चांदुरकर व न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. नव्याने मूल्यांकन करून निकाल जाहीर करावी, तोवर एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी तिची विनंती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT