Two men are no more in accident in Bhandara district  
विदर्भ

भरधाव ट्रकनं दिली दुचाकीला धडक; भंडारा जिल्ह्यातील दोन युवक जागीच ठार

दीपक फुलबांधे

लाखांदूर (जि. भंडारा) : अर्जुनी/मोरगाव तालुक्‍यातून दुचाकीने लाखांदूर तालुक्‍यातील गावात येताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघाजणांचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना आज, शनिवारी सकाळी पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ घडली. ऋषी गोविंदा खोब्रागडे (वय ४२) आणि राजेंद्र मनिराम शेंडे (वय ३६) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी सकाळी ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघे अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातून एमएच ३५ / क्‍यू ७९२५ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने लाखांदूर तालुक्‍यातील पिंपळगाव (कोहळी) येथे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या सीजी ०८/ एल २१५५ क्रमांकाच्या ट्रकने पिंपळगाव (कोहळी) गावाजवळ दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. अपघात एवढा जोरदार होता की, या धडकेत दुचाकीवरील ऋषी खोब्रागडे आणि राजेंद्र शेंडे हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघातानंतर या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना व लाखांदूर पोलिसांना दिली. त्यानंतर ठाणेदार मनोहर कोरेटी, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक तामेश्वर चमाराय साहू (वय २१, रा. राजनांदगाव) याला अटक केली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT