file photo 
विदर्भ

काय म्हणाले डॉक्टर, कोरोनामुक्तांना पुन्हा बाधा नाही...मात्र धोका टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्‍यक

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या जवळपास साडेतीन हजारांच्या घरातील रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झाल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे. बरे झालेल्यांपैकी पुन्हा कुणालाही परत बाधा झाली नाही. त्यामुळे वैद्यकीयतज्ज्ञ समाधान व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण व शहरी भागात रोजच तिहेरी आकड्यात पॉझिटिव्ह अहवाल येत आहेत. कोरोनाची जनमानसात भीती कमालीची वाढत चालली आहे. मात्र, अजूनही आपल्याला काहीच होणार नाही, हा बिनधास्तपणा कायम आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्याने बाजारपेठ पूर्ण उघडली आहे. वेळही सायंकाळी सातपर्यंत वाढवून देण्यात आला आहे.

कामानिमित्त बाहेर निघणाऱ्यांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, दुकाने, कार्यालयांत सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, घराबाहेर पडणारे नागरिक म्हणावी तशी काळजी घेताना अजूनही दिसत नाहीत. मार्च ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत बाधित झालेल्या साडेचार हजार रुग्णांपैकी साडेतीन हजारांच्या घरांत रुग्ण "पॉझिटिव्ह टू. निगेटिव्ह' होऊन आपापल्या घरी पोहोचले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांना तीन महिन्यांनंतर पुन्हा बाधा होण्याची शक्‍यता असते. डॉक्‍टरांनी त्यांच्यावर गरजेनुसार उपचार केलेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढविली. त्यामुळे सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात एकही कोरोनामुक्त झालेला रुग्ण पुन्हा बाधित झालेला नाही. त्यामुळे डॉक्‍टर समाधान व्यक्त करीत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी घरी सुरक्षित राहून काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपर्कात कुणाच्या कळेना?

कोरोनाचा समूह संसर्ग झालेला आहे. त्यामुळे शहरी व गावखेड्यांत रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाकडून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर भर दिला जात असला तरी आपण कुणाच्या संपर्कात आलोत, हे अनेकांना सांगताच येत नाही. बाजारपेठ खुली झाल्याने नागरिक बिनधास्त कुठेही नियम न पाळताच फिरताना दिसत आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत आलेला संपर्क सहज कळत होता. आता, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये अडचणी येत आहेत.


पोलिस पुन्हा रस्त्यावर

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक मास्कविनाच बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिस पुन्हा रस्त्यावर उतरलेले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काठीचा प्रसादही मिळत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT