file Photo
file Photo 
विदर्भ

संत्रा, मोसंबीसाठी अनुदान मिळणार कधी?

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि.नागपूर) : नागपूर जिल्यातील नरखेड व काटोल तालुक्‍यातील अति उष्ण तापमानामुळे वाळलेल्या संत्रा व मोसंबी झाडांचे अनुदान मिळावे ही मागणी शेतकरी मागील चार महिन्यांपासून करीत आहे. मात्र, निवडणूक लागल्यावरही काहीच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. 
मार्च ते जुलै अखेरपर्यंत अति उष्णतेचा पारा 48 अंशांवर गेला होता. नरखेड व काटोल तालुक्‍यातील पाण्याची पातळी बाराशे फुट खोलवर गेली. विहीर, बोर, सिंचन प्रकल्पाने तळ गाठला असतानाच या दोन तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा संत्रा व मोसंबीची झाडे वाळली. झाडे जगविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हाती काहीच शिल्लक राहिले नाही. पैसा व झाडे दोन्ही गेले. कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार नरखेड तालुक्‍यात 10 हजार 140 हेक्‍टरमध्ये संत्र्याची झाडे आहे. यापैकी 3 हजार 937.5 हेक्‍टरमधील झाडे वाळलेली आहेत. त्यात 6 हजार 200 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मोसंबीच्या 2 हजार 534 हेक्‍टरमधील झाडांपैकी 840.2 हेक्‍टर मधील झाडे वाळलेली असून यात 754 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आंबा पिकांची 5 हेक्‍टरमधील झाडांपैकी 3 हेक्‍टरमधील झाडे वाळली असून 5 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच 25 हेक्‍टरमधील लिंबूच्या बागापैकी दहा हेक्‍टरमधील झाडे वाळली. यात 12 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नरखेड तालुक्‍यात 12 हजार 704 हेक्‍टरमध्ये फळ पिकांची झाडे असून 4 हजार 790.7 हेक्‍टरमधील फळपिकांची झाडे वाळल्याने 6 हजार 971 हेक्‍टरमधील बागायतदारांचे नुकसान झाले आहे. 
कृषी विभागाने काहीच फळपिकांच्या झाडांचे पंचनामा केले आहे. हजारो झाडे मृत अवस्थेत शेतात उभी आहे तर काहींनी काढून टाकली आहे. यामुळे त्यांच्या झाडांचा पंचनामा झाला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. दुसरीकडे महसूल विभाग, पंचायत समिती व कृषी विभागाने सर्वेक्षण करून तयार केला असून त्यानुसार 37.7 टक्‍के फळ पिकांची झाडे या उन्हाळ्यात वाळली आहे व यात 6 हजार 971 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. 
जास्त पावसामुळे फळगळ वाढली 
मागील वर्षी दुष्काळ व यंदा अतिवृष्टीमुळे झाडांवर विविध रोगांचा आक्रमण झाले आहे. बुरशीजन्य रोग वाढल्याने फळगळ वाढली आहे. यामुळे उरलेल्या बागामधून मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाढत्या फळगळीचा पंचनामा कृषी विभागाने तत्काळ करावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT