विदर्भ

दोन कोटी रोजगार, 15 लाख कुठे गेले?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता हटवले. सोबतच दोन कोटी युवकांना रोजगार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू असेही दावे केले होते. त्याचे काय झाले असा सवाल करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली. 
बघेल यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी खामलारोडवरील दंतेश्‍वरी झोपडपट्टी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी ही लाढाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशीष देशमुख अशी नव्हे तर दोन विचारांची असल्याचे सांगून महाराष्ट्राच्या भल्यासाठी कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. 
देशात मंदी असल्याचे सरकार कबूल करते. मात्र, त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आज नवे रोजगार तर सोडा, आहेत तेही रोजगार युवकांच्या हातून गेले आहेत. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले. अडीच हजार रुपये क्विंटलने धान खरेदी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्यामुळे छत्तीसगडमध्ये मंदीचे कुठलेच पडसाद जाणवत नाही. बाजारपेठा सजल्या आहेत. मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. दुसरीकडे भाजपच्या हातात असलेल्या राज्यांना मंदीची झळ सोसावी लागत असेही बघेल यावेळी म्हणाले. 
भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेट सेक्‍टरची चिंता 
भाजपला शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेट सेक्‍टरची जास्त चिंता आहे. त्याकरिता आरबीआयकडून एक लाख 74 हजार कोटी रुपये घेऊन कॉर्पोरेट सेक्‍टरला दिले. उद्योगपतींचे कोट्यवधींचे कर्ज माफ केले. सध्या देशातील अस्थिर परिस्थिती बघता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कोण विकास करू शकतो, शेतकऱ्यांचे कर्ज कोण माफ करू शकते याचा विचार करून जनतेने मतदान करावे, असे आवाहन भूपेश बघेल यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT