sink
sink  
विदर्भ

"ते' युवक पावसाळी पर्यटनाला गेले होते, मात्र काळाने साधली संधी... 

संतोष तापकिरे

अमरावती  : पावसाळ्यात पर्यटनासाठी अमरावती येथून मध्य प्रदेशच्या धारखोरा येथे गेलेल्या तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. मृत युवक हे बडनेरा आणि शहरातील मसानगंज परिसरातील रहिवासी आहेत. आशीष कोटेजा, दीपक मिश्रा व विनय कुशवाह अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे असल्याचे महापालिकेचे माजी बांधकाम समिती सभापती अजय सारस्कर यांनी सांगितले. 

गुरुवारी (ता. 23) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील सहा युवक दुचाकीने धारखोरा येथे पोहोचले. हे ठिकाण परतवाड्यापासून वीस किलोमीटर अंतरावर धारणी मार्गावर असून ते मध्य प्रदेशात येते. नमूद तिघांना डोहात पोहोण्याचा मोह आवरला नाही. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यामुळे ते खोल पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळ परतवाड्यापासून कमी अंतरावर असल्याने परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर मध्य प्रदेशातील भैसदेही पोलिस घटनास्थळी पोहोचायचे होते. काही लोकांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आशीष, दीपक आणि विनय यांचे मृतदेह घेण्यासाठी अमरावती येथून त्यांचे नातेवाईक धारखोरा येथे रवाना झाल्याचे सारस्कर यांनी सांगितले. परतवाडा किंवा मध्य प्रदेशातील भैसदेही पोलिसांकडून मृत युवकांच्या नावांची पुष्टी होऊ शकली नाही. 

भैसदेही पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बसंत आहाके यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. आज तीन युवकांनी पोलिस ठाण्याला येऊन माहिती दिली की आम्ही सहा व्यक्ती धारखोरा येथे फिरण्यास गेलो असता त्यातील तीनजण बुडाले. त्यात दीपक विनोद मिश्रा, (वय 18, रा. गोपालनगर), आशीष कोटेजा (वय 19, रा. नवीवस्ती बडनेरा) व विनय लक्ष्मीनारायण कुशवाह (वय 18, रा. मसानगंज) हे डोहामध्ये बुडाले. माहिती मिळताच ठाणेदार सदानंद मानकर यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक सतीश पुनसे, शेख नाझिम, सुशांत महल्ले, मंगेश फुकट, शफीक शेख, सतीश रिठे, सईद भोपाली हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या तिन्ही युवकांना बाहेर काढून मोठ्या कसरतीने वाहतुकीच्या रस्त्यापर्यंत आणून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले, असे परतवाडा पोलिसांनी सांगितले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT