Sherni Movie Sakal
युथ्स-कॉर्नर

ऑन स्क्रीन : शेरनी : टोकदार संघर्षाची आशयघन सफर

जंगलाच्या परिसंस्थेत आधी मुंगी येते व सर्वांत शेवटी वाघ येतो. मात्र, माणसानं जंगलावर अतिक्रमण केल्यानंतर वाघ आणि मनुष्य हाच संघर्ष सुरू होतो.

महेश बर्दापूरकर

जंगलाच्या परिसंस्थेत आधी मुंगी येते व सर्वांत शेवटी वाघ येतो. मात्र, माणसानं जंगलावर अतिक्रमण केल्यानंतर वाघ आणि मनुष्य हाच संघर्ष सुरू होतो. या संघर्षात जंगल, तेथील आदिवासी, प्राणी, पर्यावरणवादी, राजकारणी आणि जंगलाची जबाबदारी असलेल्या वनरक्षकांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरतात. दिग्दर्शक अमित मसुरकर यांनी `शेरनी’ या चित्रपटाद्वारे या सर्व संघर्षाचे नेमके पैलू उलगडून दाखवत व सध्याच्या व पुढील अनेक पिढ्यांना विचार करायला लावणारा शेवट करीत छान परिणाम साधला आहे. विद्या बालनसह सर्वच कलाकारांचा अभिनय व राकेश हरिदास यांचं छायाचित्रण यांमुळं हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरतो.

शेरनीची कथा आहे विद्या विन्सेंट (विद्या बालन) या डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरची. नरभक्षक वाघिणीची समस्या निर्माण झालेल्या भागात तिची बदली होते आणि ती मोठ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी येते. परिसरात निवडणुकांचं वारं वाहत असतं व त्यामुळं ही समस्या अधिकच टोकदार बनते. विद्याचा बॉस बन्सल (बिजेंद्र काला) राजकारणी अंगावर येऊ नयेत म्हणून या समस्येवरचं सोपं समाधान शोधू पाहतो, तर त्याच्या इशाऱ्यावर शिकारी (सरत सक्सेना) बंदूक घेऊन जंगलात फिरू लागतो. आजी आमदार वाघिणीविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आवेशात फिरतो व तर माजी आमदार गावकऱ्यांना त्याच्या विरोधात उभा करतो. हा संघर्ष चहुबाजूंनी पेटतो आणि ज्याला बाजू मांडण्याची संधी नाही, त्याच्याच विरोधात निकाल लागतो.

दिग्दर्शकानं कथेच्या ओघात दाखवलेल्या प्रत्येक संघर्षावर एक प्रबंध तयार होईल, एवढा हा विषय गहन आहे. मात्र, त्याला कोणताही फिल्मी टच न देता माहितीपटाच्या अंगानं कथेची मांडणी केलेली दिसते. त्यामुळं मनोरंजनाच्या आघाडीवर हा चित्रपट कमी पडत असला, तरी आशयाच्या बाबतीत तो अतिशय श्रीमंत झाला आहे. मसुरकर यांनी ‘न्यूटन’ या चित्रपटाप्रमाणंच जंगल आणि आदिवासी यांचं अगदी वास्तवदर्शी चित्रण इथंही केलं आहे. जंगलानंतर गावाचा पट्टा व पुन्हा जंगल अशी मांडणी अनेक गावांत असल्यानं मनुष्य विरुद्ध प्राणी हा संघर्ष अनिवार्य ठरतो. त्यात महामार्ग, खाणी अशी ‘विकासकामं’ केल्यामुळं प्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि संघर्ष अधिक तीव्र होतो. ही मांडणी दिग्दर्शकानं अत्यंत नेटकी (व तेवढ्याच प्रभावी छायाचित्रणासह) केली आहे. उंचावरून घेतलेल्या एका प्रसंगामध्ये या समस्येची तीव्रता प्रेक्षकांना दाखवण्याचं काम दिग्दर्शक-छायाचित्रकार जोडीनं केलं आहे. चित्रपटाचा शेवट सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणं अनेक पिढ्यांना विचार करायला भाग पाडणारा आहे.

विद्या बालननं वन अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं साकारली आहे. ‘एवढी मोठी समस्या आली असताना एका महिला अधिकाऱ्याला का पाठवलं,’ असा प्रश्‍न राजकारणी विचारतो, तेव्हा चेहऱ्यावरच्या झटक्यात बदललेल्या भावांतून तिनं महिलांच्या सर्व व्यथांना वाट मोकळी करून दिली आहे. विद्याच्या अभिनयामुळं असे अनेक प्रसंग जिवंत झाले आहेत. विजय राज, नीरज काबी, बिजेंद्र काला, सरत सक्सेना, इला अरुण आदी कसलेल्या कलाकारांनी तोलामोलाची साथ तिला मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या! शिक्षकांच्या ॲप्रूव्हल अन् अपॉइंटमेंटसाठीही पैसे लागतात, नितीन गडकरींचा परखड टोला!

Russian Woman : हिंदू संस्कृतीने भारावून गेलेली रशियन महिला मुलांसह आढळली गोकर्णच्या जंगलात; गुहेत तिच्यासोबत काय घडलं?

Panchang 13 July 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Latest Marathi News Updates : शरद पवारांच्या पक्षात भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदेंचे नाव चर्चेत

Sunday Healthy Breakfast: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक व्हेजिटेबल मुग डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT