काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काही वेळातच नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशी होणार आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत राहुल गांधी ईडीच्या चौकशीसाठी जाणार असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसने सत्याग्रह मोर्चा आयोजित केला आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारच्या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. (Rahul Gandhi ED Case News)
त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सत्य का संग्राम सुरुच राहील. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ब्रिटीशही काँग्रेसचा आवाज दडपू शकले नाही, मग आत्ताचं हे सरकार कसं काय दडपू शकेल? असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयापर्यंत शांतता मोर्चा काढणार आहेत, अशी माहितीही सुरजेवाला यांनी दिली.
आम्ही संविधानाचे रक्षणकर्ते आहोत. आम्ही झुकणार नाही किंवा घाबरणार नाही. मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करुन मोदी सरकारने हे सिद्ध केलं की, ते काँग्रेसमुळे हादरले आहेत, असंही सुरजेवाला म्हणाले. तसंच मोदी सरकारने दिल्लीत अघोषित आणिबाणी लागू केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
राहुल गांधींच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाकडे जाणाऱ्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.