Corona Update: देशात 24 तासांत 3, 714 नव्या रुग्णांची नोंद

देशात सोमवारी 4, 518 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती.
Corona Patient Updates in India
Corona Patient Updates in India

नवी दिल्ली : देशभरात गेल्या 24 तासांत 3,714 नव्या कोरोना (Corona) बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2,513 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या आकडेवारी चार हजारांच्या घरात नोंदविली जात होती. त्यात आज काहिशी कमी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाल आहे. देशात सोमवारी 4, 518 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. (Corona Patient Updates in India)

देशात सध्या 26 हजार 976 इतक्या सक्रिय कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 5 लाख 24 हजार 708 इतक्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 4 कोटी 26 लाख 33 हजार 365 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुन्हा एकदा लसीकरणावर जोर दिला जात आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत 194 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Corona Patient Updates in India
आषाढी वारीबाबत आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण मुंबईत; 24 तासात 1,036 बाधित

देशासह राज्यातदेखील नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1036 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 374 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (Maharashtra Corona Update) राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्यूदर 1.87 टक्के इतका नोंदवण्यात आला असून, राज्यातील आज घडीला 7,429 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील सर्वाधिक 5,238 रूग्ण हे एकट्या मुंबईत असून, या खालोखाल ठाण्याचा क्रमांक असून ठाण्यामध्ये 1,172 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढताना दिसून येत आहे.

Corona Patient Updates in India
चौथ्या लाटेबाबत BMC चे टास्क फोर्ससोबत विचारमंथन; येत्या आठवड्यात निष्कर्ष काढणार

मास्क वापरण्याचे पुन्हा आवाहन

राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येनंतर टोपेंनी नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. जरी राज्यात मास्क सक्ती नसली तरी, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून मास्क वापरावा असे टोपे म्हणाले. सध्या तरी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याचा कोणताही विचार नसल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com