
India vs Pakistan Cricket Clash Faces Emotional Protest Families of Martyrs Oppose Match
Esakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याला देशभरातून चाहत्यांनी विरोध केला आहे. पहलागममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला धडा शिकवला. यानंतर आता पाकिस्तानशी सामना कशाला असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. माझ्या भावावर गोळ्या झाडल्या गेल्या. तो मला पुन्हा द्या आणि नंतर पाकिस्तानसोबत सामना खेळा अशा शब्दात सावन परमार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.