सैन्य माघारीचा मुद्दा किचकट - एस. जयशंकर

s jaishankar
s jaishankar

अमरावती - गलवान संघर्षानंतर भारत-चीन यांच्यात लष्करी पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. सैन्य माघारीचा मुद्दा किचकट आहे. चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नसला तरी चीनशी यापुढेही चर्चा सुरूच राहील, असेही ते म्हणाले. विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना जयशंकर म्हणाले, की आतापर्यंतच्या चर्चेतून ठोस परिणाम समोर आले नाहीत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीन यांच्या संघर्षावर दोन्ही देशांत मंत्रिपातळीवर चर्चा होऊ शकते काय, असे विचारले असता एस. जयशंकर म्हणाले, की माघारी घेण्याचा मुद्दा सैनिकांवर अवलंबून असल्याने ती प्रक्रिया किचकट आणि जटिल आहे. भौगोलिक स्थितीत काय घडले आहे, हे माहीत असणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने कमांडर काम करत आहेत.

सैनिकी व राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. लष्करी पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. यावरुन काही प्रमाणात प्रगती झाल्याचे वाटते, परंतु ते निष्कर्षाप्रत येऊन पोचले आहे, असे म्हणता येणार नाही. या बैठकांचे परिणाम समोर आलेले नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

आपण पंधरा देशांना कोविड प्रतिबंधक लशींचा पुरवठा केला आहे. अन्य २५ देश लशींची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे  लसीकरणाच्या मुद्द्यावर जगाच्या नकाशावर भारताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 
- एस.जयशंकर, परराष्ट्रमंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com