
नवी दिल्ली : ‘‘पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथील अल्पसंख्याकांचा होणारा छळ भारताने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडला आहे. देश म्हणून पाकिस्तानची कट्टरतावादी आणि असहिष्णू मानसिकता बदलू शकत नाही. इंदिरा गांधींनाही ते शक्य झाले नाही,’’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले.